२७ टक्के OBC उमेदवारांना तिकीट देणार असल्याची फडणवीसांची घोषणा
ऑनलाईन टीम/तरुण भारत
ओबीसी आरक्षणाशिवाय (obc reservation) निवडणूक घ्याव्यात आणि दोन आठवड्यात अहवाल सादर करावा असे सुप्रीम कोर्टाने (supreme court) निवडणूक आयोगाला आदेश दिले आहेत. यांनतर ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक होणार असल्याने भाजप आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये वाकयुद्ध सुरु आहे. तर भाजपने ‘ओबीसी आरक्षण लागू किंवा नाही, पण भाजप २७ टक्के उमेदवारांना तिकीट देणार’, अशी घोषणा विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी केली. तसंच, ‘भाजपचा डीएनए ओबीसी असून याच समाजाच्या जीवाव मोठा झालेला पक्ष आहे’, असंही फडणवीस यांनी म्हटलं. ते भाजप आयोजित ओबीसी मेळाव्यात बोलत होते. (Devendra Fadnavis Alleges MVA government over OBC reservation)
दरम्यन, ओबीसी आरक्षण न लावता निवडणुका पार पाडाव्या आणि दोन आठवड्यात अहवाल जाहीर करावा, अशी घोषणा न्यायालयाने केली. त्यानंतर राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. मात्र, ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्यावर राज्यकर्त्यांचा विरोध आहे. या प्रकरणी भाजपने दादरच्या कार्यालयात ओबीसी मेळावा घेतला. यावेळी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली. (BJP OBC Melava)
BJP ओबीसी मोर्चानं महाविकास आघाडी सरकारचा बुरखा फाडला
ओबीसी मेळाव्यात बोलताना फडणवीसांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. “भाजप ओबीसी मोर्चानं महाविकास आघाडी सरकारचा बुरखा फाडला आहे. तुम्ही सरकारचा ओबीसी विरोधी चेहरा जनतेसमोर आणला आहात आणि रस्त्यावर सातत्यानं ओबीसींच्या प्रश्नावर मार्ग काढण्यास भाग पाडलं आहे, असं फडणवीस म्हणाले. मंडल आयोगाच्या अंमलबजावणीनंतर महाराष्ट्रात पहिल्यांदा ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होत आहेत. या निवडणुका झाल्या आहेत आणि राजकीय आरक्षण गेलं नाही, या राजकीय आरक्षणाचा मुडदा पाडला आहे.”
सरकारने OBC आरक्षणाचा खून केला
सरकारने या राजकीय आरक्षणाची ठरवून कत्तल केली. खून केला. यामागे मोठं षडयंत्र आहे. २०१० साली पहिल्यांना कोर्टाने ५० टक्के आरक्षण देता येणार नाही असं सांगितलं होतं. मात्र, काँग्रेस सरकारने काही केलं नाही, असा आरोप विरोधीपक्ष नेत्याने केलाय. तसेच ओबीसी आरक्षण लागू किंवा नाही, पण भाजप २७ टक्के OBC उमेदवारांना तिकीट देणार असल्याची घोषणा फडणवीसांनी केली.