ऑनलाईन टीम/ तरुण भारत
मुंबई: अलिकडच्या काळात बोलघेवड्या नेत्यांची गर्दी आहे. बोलणारे खूप आहेत, पण तसं वागत नाहीत. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी जे बोलतात ते करून दाखवणारे नेते आहेत. ८ वर्षात मोंदीवर अनेक आरोप झाले. पण टीकाकारांना भीक न घालता मोदींनी काम सुरुच ठेवलं.बहुजन हितायं, बहुजन सुखाय हा मोदींच्या कारभाराचा मूलमंत्र आहे. गेल्या ८ वर्षात गरीब कल्याणाचा कार्यक्रम त्यांनी राबवला. यामुळे देशातील प्रत्येक गरीबाला हे माझं सरकार आहे अस वाटायला लागलयं. फक्त माझ सरकार माझी जबाबदारी एवढ्यापुरते मर्यादित राहिले नसून देशाची जबाबदारी त्यांनी पेलत काम केले आहे असा टोला विरोधी पक्षनेते देवेंन्द्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडीला लगावला. आज ते भाजपच्या कार्यकारणीच्या बैठकित बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले, गेल्या ८ वर्षात मोदींनी भारताला शक्तिशाली केल आहे. देशात एक इको सिस्टीम तयार झाली आहे. पंतप्रधान जे बोलतात ते करतात. मोदींच्या काळात भारताकडून विक्रमी निर्यात झाली आहे. हे आकडेवारीवरून स्पष्ट झालंय. जगभरात महागाईची चर्चा, भारताकडून ठोस उपाययोजना करण्यात आल्या आहेत.अमेरिका,युरोपच्या नाकावर टिच्चून रशियाकडून तेल खरेदी केलं. अमेरिकेच्या दबावाखाली झुकलो नाही. रशियाची कच्च्या तेलाची आॅफर स्विकारून मुत्सद्देगिराचं दर्शन घडवलं.
पेट्रोल -डिझेल भाववाढीवर बोलताना ते म्हणाले, मोदी सरकारने दोन वेळा पेट्रोल -डिझेलचे भाव कमी केले. २ लाख २० हजार कोटीचं नुकसान सोसून केंद्राकडून दिलासा मिळाला. तर महाराष्ट्र सरकारने मे महिन्यात एप्रिल फुल केलं असा टोलाही लगावला.मुख्यमंत्री उध्दव ठाकरे ( Uddhav Thackeray) आणि नाना पटोले (Nana Patole)यांच्यावर निशाणा साधताना ते म्हणाले, राज्याच्या टॅक्सपेक्षा केंद्राचा टॅक्स कमी आहे. राज्याचा टॅक्स २९ रुपये आहे. तर केंद्राचा १९ रुपये आहे. पेट्रोल- डिझेलच्या वाढत्या भावाला कोणता टॅक्स लावणार असा सवाल केला. पुढे बोलताना ते म्हणाले, महाराष्ट्र सरकारमुळे महागाईत वाढ होत आहे. त्य़ामुळे या सरकार विरोधात एल्गार पुकारला पाहिजे असेही ते म्हणाले. खोटारड्या लोकांना उघड पाडा अशी विनंताही त्यांनी यावेळी केली.