ऑनलाईन टीम/भारत
ओबीसी आरक्षण हातातून घालविणे हे महाविकास आघाडी सरकारचे पाप आहे. ओबीसी आरक्षण रद्द करणे हे राज्य सरकारमधील कुणाचे तरी षडयंत्र आहे. महाविकास आघाडी सरकारने यांनी ओबीसी आरक्षणाची हत्या केली आहे, असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला.
दरम्यान, राज्यात ओबीसी आरक्षणावरून भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये जुंपली आहे. दररोज एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. आज भाजपच्या पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यसमिती बैठकीत बोलताना फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली.
आम्ही जे वारंवार म्हणतो, की ओबीसी आरक्षण घालविणे हे महाविकास आघाडी सरकारचे पाप आहे. ओबीसी आरक्षण रद्द करणे हे राज्य सरकारमधील कुणाचे तरी षडयंत्र आहे. यांनी ओबीसी आरक्षणाची हत्या केली आहे, असं टीकास्त्र फडणवीसांनी राज्य सरकारवर डागलं.
ओबीसी आरक्षणावर आपण सातत्याने संघर्ष करीत आहोत. डिसेंबर १९ ते मार्च २२ या काळात केवळ वेळकाढू धोरण राज्य सरकारने राबविले. जी कार्यपद्धती मध्य प्रदेश सरकारला कळविली, तीच महाराष्ट्र सरकारला सुद्धा वारंवार सांगितली. पण मध्य प्रदेश जे करू शकले, ते महाराष्ट्राने केले नसल्याचा टोलाही देवेंद्र फडणवीसांनी लगावलाय.