कोल्हापूर : या वर्षभरात पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी कोल्हापुरातील आजरा (ajra, kolhapur) येथे केला आहे. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याने पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आले आहे. आजरा येथे स्वामी विवेकानंद पतसंस्थेद्वारे उभारण्यात आलेल्या लक्ष्मीदेवी उद्यान याच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले, महाविकास आघाडी विविध कोर्ट प्रकरणात मागे पडली आहे. येणाऱ्या वर्षभरात देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील. मंगळवारपासून चंद्रकांत पाटील हे कोल्हापुरात असून गुरुवारी त्यांनी आजरा येथे बूथ कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन मार्गदर्शनही केले आहे.