कोणाच्या हट्टापायी मंदिराचे बांधकाम पाडता
प्रतिनिधी/ सातारा
कित्येक पिढय़ांनी जरंडेश्वर मारुती मंदिराचे दर्शन घेतले. मंदिराला एक वेगळा इतिहास आहे हे तेथील स्थानिक आर्वजून सांगतात. मात्र, हेच मंदिर पूर्णपणे रस्त्यात आणून ते हटवण्याचा डाव प्रशासनाचा आहे. दुसऱया बाजूला अन्य धर्मियाचे थडगे आहे. त्या थडग्याला हातही लावला गेला नाही. त्यामुळे मंदिराचे बांधकाम कोणाच्या हट्टापायी पाडता?, रस्त्याचे रुंदीकरण करायचे असेल तर दोन्ही बाजूने समान करायला हवे. मंदिर हटवायचे असेल तर अगोदर पर्यायी जागेत मंदिर बांधा मगच मंदिराला हात लावा, अन्यथा मंदिराला हात लावू देणार नाही, असा इशारा जरंडेश्वर मारुती भक्तांनी दिला आहे.
सध्या वाढे फाटा ते बसस्थानक या दरम्यान रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. हे काम होत असताना जरंडेश्वर मारुती मंदिराच्या बाजूने सहा ते आठ फुट रुंदीने खोदकाम सध्या सुरु केले आहे. मंदिराच्या पाठीमागील आणि पुढील भागात खोदकाम करण्यात आले आहे. हे काम करत असताना रस्त्या दुसऱया बाजूला अद्याप कसलीही मोजणी वा काहीच काम करण्यात आले नाही. त्यामुळे प्रशासनाचा घाट मंदिर पाडण्याचा कोणासाठी आहे असाच सवाल उपस्थित होत आहे. जरंडेश्वर मंदिराच्या बचावासाठी भक्तांची चळवळ उभी राहत असून मंदिर अगोदर बांधून द्यावे, नंतरच असलेल्या मंदिराला हात लावावे, असा इशारा प्रशासनाला जरंडेश्वर मारुती भक्तांच्याकडून देण्यात येत आहे. त्यामुळे हा वादाचा मुद्दा बनला आहे. हे काम असेच सुरु राहिले तर मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ही चुकीची बाब आहे
शालेय जीवनात आठ मुल्यांकन आपल्याला शिकवले जातात. त्यापैकी सर्वधर्मसमभाव हा एक. देशात हे मुल्याकंन अंमलात आणले आहे. देशात शांततेचे वातावरण नांदते आहे. परंतु जरंडेश्वर नाका येथील परिस्थिती पाहता विकासाच्या गप्पा प्रशासन मारत आहे. विशिष्ठ धर्म सहिष्णू आहे म्हणून त्यालाच घाव करणे, त्यालाच कुठेतरी शांत करणे हे चुकीचे आहे. त्याच ठिकाणी दुसऱया बाजूला रस्त्याची कसलीच डेव्हल्पमेंट करत नाही. इंचभर सरकत नाही. थडगे उभे आहे, त्याकडे बघत नाही. दोन्हीचा इतिहास बघितला तर मंदिर जुने आहे. पर्यायी मार्ग काढला असेल तर अगोदर मंदिर उभे करा, उद्घाटन करा, मगच आहे या मंदिराला हात लावा.
गणेश अहिवळे, सातारा
विकासाच्या नावाखाली मंदिरे पाडाता काय ?
wमंदिराच्या रक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांनी यवनांना सळो की पळो करुन सोडले होते. मात्र आता या देशात विकासाच्या नावाखालीच जर मंदिरे पाडली जात असतील तर काय सुरु आहे या साताऱयात. ज्या साताऱयातून अटकेपार झेंडे लावले. सरकार नेमके काय करते आहे. बोळय़ाने दूध पिते की काय?, जरंडेश्वर मारुती मंदिराचीच बाजू संबंधित विभागाला कशी दिसली. मंदिराला हात लावायचा नाही, आमच्या भावना दुखावत्याल.
प्रशांत नलावडे, धर्मवीर युवा मंचचे अध्यक्ष