कोलकाता
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्राविरोधी मोर्चाला वेग दिला आहे. ममता बॅनर्जी या केंद्र सरकारविरोधात 29 मार्चपासून दोन दिवसीय धरणे आंदोलन करणार आहेत. केंद्र सरकारकडून पश्चिम बंगालला सापत्नपणाची वागणू मिळत असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे. याच पक्षपाती भूमिकेच्या विरोधात ममतादीनी 29 आणि 30 मार्च रोजी केंद्रातील भाजप सरकार विरोधात धरणे आंदोलन करणार असल्याचे तृणमूल काँग्रेसकडून सांगण्यात आले.