कुरुंदवाड/प्रतिनिधी
मैत्रेय ग्रुप कंपनीमध्ये गुंतवणूक केलेला पैसा परत मिळावा यासाठी राज्यभरातील लाखों गुंतवणूकदार शासन आणि प्रशासनाचे लक्षवेधण्यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीदिनी राज्यभरात धरणे आंदोलन करणार आहेत. अशी माहिती मैत्रेय उपभोक्ता एवं अभिकर्ता असोसिएशन यांनी प्रसिद्धी पत्रकार द्वारे दिली आहे.
१९९८ साली मैत्रेय ग्रुप ऑफ कंपनीची स्थापना झाली. शासनाकडून रीतसर कायदेशीर नोंदणीकृत झाली. ठाणे येथे कंपनी चे कार्यालय सुरू झाली. महाराष्ट्र शासनाच्या स्वयं रोजगार योजनेला पूरक उपक्रम राबविण्यात आल्याने शासनाकडून कंपनीला अनेक पुरस्कार प्रदान करण्यात आले. अन्य सेवाभावी संस्था तसेच अनेक नेते आणि मान्यवरांकडून कंपनी चे वेळोवेळी कौतुक करण्यात आली. सन २००३ नंतर श्रीमती वर्षा सत्पाळकर कंपनी च्या अध्यक्षा झाल्या. कंपनी च्या अध्यक्षा महिला झाल्या मुळे ठेवीदार/ प्रतिनिधी महिला आणि बेरोजगार तरूण मंडळी आकर्षित झाले. सन १९९८ म्हणजे सुरूवातीपासून २०१५ पर्यंत ( १७ वर्षं) सर्व गुंतवणूकदारांच्या परताव्याची रक्कम विनाविलंब कंपनी कडून मिळाली आहे. कंपनी कडून नियमाप्रमाणे एजंट वर्गाला मिळालेल्या कमीशनवर केंद्र सरकारच्या आयकर खात्याकडून इन्कम टॅक्स वसूल करण्यात आले आहे.
हे ही वाचा : आम्ही उद्धव ठाकरेंसोबत, सुनील महाराजांची पहिली प्रतिक्रिया
अल्पावधीतच संपूर्ण महाराष्ट्र सह इतर अनेक राज्यांत जाळे पसरले.राज्यातील व भारतातील लाखों गुंतवणूकदारांनी कोट्यावधींची गुंतवणूक केली. प्रारंभी पासून २०१५ पर्यंत सर्व ठेवीदारांना रितसर परतावे दिले. शासनाकडून व नेते मंडळी कडून कंपनीची स्तुती व प्रशंसा होऊ लागली. या सर्व गोष्टी मुळे सर्व सामान्य नागरिक, ठेवीदार व प्रतिनिधी वर्ग विशेष करून महिला वर्ग प्रभावित झाले आणि शासन पुरस्कृत मैत्रेय कंपनी कडे मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक सुरू झाली.
कोट्यावधी रूपयांची मालमत्ता जमा होताच मैत्रेय कंपनीने गुंतवणूकदारांचा विश्वासघात केला. २०१५-१६ च्या दरम्यान मैत्रेयने गाशा गुंडाळला.यामुळे गुंतवणूकदार हैराण झाले आहेत. मैत्रेयचे एजंट म्हणून काम करणाऱ्या महीला आणि बेरोजगार तरूणांना मरणासन्न यातना भोगाव्या लागत आहेत.गेल्या सात वर्षांत अनेकांनी आत्महत्या केल्या आहेत.आजही महिला प्रतिनीधींना घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे.
दरम्यान असोसिएशन कडून उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शासनाने MPID कायद्याप्रमाणे कंपनीच्या मालकीचे मालमत्ता जप्त करून महाराष्ट्र शासनाकडून पीडितांना परताव्याची वाटप होणे अपेक्षित आहे. शासनाने सर्व मालमत्ता जप्त केले आहे.
आदेश निर्गमित होऊन चार वर्षे झाली तरी अद्याप परताव्याचा वाटप सुरू झाली नाही. मैत्रेय कंपनीकडून/ शासनाकडून परतावे मिळावेत यासाठी राज्यभरातील प्रशासकिय कार्यालयासमोर मोर्चे,आंदोलने केली.शासन दरबारी वेळोवेळी निवेदने दिली परंतु याकडे शासनाकडून दुर्लक्ष केल्या जात आहे.असे प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
शासनाकडून विनाविलंब परतावे मिळावेत यासाठी राज्यातील लाखों गुंतवणूकदार यांनी २ ऑक्टोबर रोजी लक्षवेधी धरणे आंदोलन कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर जिल्हा तसेच कर्नाटक राज्यातील प्रतिनिधी यांच्या वतीने सांगली येथील महात्मा गांधी पुतळा सिटी पोस्ट ऑफिस जवळ येथे करण्यात येणार या धरणे आंदोलनात राज्यातील गुंतवणुकदारांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे असे निवेदन द्वारे आवाहन मैत्रेय उपभोक्ता एवम अभिकर्ता असोसिएशनच्या वतीने यासिन सय्यद( कोल्हापूर), प्रकाश मगदुम (कर्नाटक), डाॅ.जी.एन.हरपनहळ्ळी (सांगली, )राजेश बोंगाळे,नंदकुमार गौड, लक्ष्मण लाटवडे,विलास जगताप, प्रवीण पंडित, सौ.निलीमा कुष्टे, सौ.नेत्रदिपा पाटील यांनी केले आहे