तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या देवावरील आणि अतीतावरील प्रगाढ विश्वासाची चर्चा या निवडणुकीच्या निमित्ताने नव्याने होत आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये त्यांच्या अनेक कृतींनी त्यांचा भविष्यावरील आणि अतीतावरील विश्वास स्पष्टपणे दर्शविला गेला आहे. त्यांचा ‘वास्तूशास्त्रा’वरही प्रगाढ विश्वास असल्याची प्रचीती अनेकदा आली आहे. 2016 मध्ये त्यांनी आपले वास्तव्य 50 कोटी रुपयांच्या नव्या वास्तूत हलविले होते, असे बोलले जात होते. ही नवी वास्तू प्राचीन ‘वास्तूशास्त्रा’च्या नियमानुसार निर्माण करण्यात आली आहे.
त्यांनी त्यांच्या सरकारी कार्यालयातील वास्तूशास्त्राच्या दृष्टीने अनुकूल असे परिवर्तन करुन घेतले होते. हे कार्यालय बेगमपेट येथे आहे. त्यांच्या विश्वासानुसार जो सर्वोच्च प्रशासक असतो, त्याचे कार्यालय कोणत्याही वास्तूत सर्वोच्च स्थानी असले पाहिजे. त्यानुसार त्यांनी हे परिवर्तन करुन घेतल्याचे बोलले जाते.
यज्ञाचे आयोजन
नूतन वास्तूत प्रस्थान करण्याआधी 2015 मध्ये त्यांनी आपल्या शेतावर यज्ञाचे आयोजन केलेले होते. हा यज्ञ आयुध महाचंडी यज्ञ म्हणून परिचित आहे. या कार्यक्रमाला 50 हजार लोकांची उपस्थित होती. हा कार्यक्रम पाच दिवस चालला.
‘6’ या संख्येवर श्रद्धा
त्यांची 6 या संख्येवर मोठी श्रद्धा आहे. 2018 मध्ये त्यांनी विधानसभा स्थगित करुन मध्यावधी निवडणुका घेण्यासाठी 6 सप्टेंबरचा मुहूर्त निवडला होता. तो 6 या आकड्यावर श्रद्धा असल्यानेच होता, असे बोलले जाते.