प्रतिनिधी /पणजी
राज्यपालांच्या अभिभाषणाचे अभिनंदन करणारा ठराव आमदार दाजी साळकर यांनी मांडला होता. सत्ताधारी पक्षातील आमदारांनी अभिनंदन ठरावाला समंत्ती देणारे विचार मांडले तर विरोधी आमदारांनी अभिनंदन ठरावाला विरोध दर्शविणारे विचार मांडले.
सरकाराची वाटचाल कशी असावी त्याबाबत मार्गदर्शन करताना, सरकार करीत असलेल्या कामाचे राज्यपालांनी अभिनंदन केले आहे असे दाजी साळकर म्हणाले. राज्यपालांनी 29 मार्च 2022 रोजी विधानसभेत अभिभाषण केले होते. सरकारच आत्मनिर्भर योजना, गरीब कल्याण योजना योग्य रितीने सुरु असून सर्वसामान्य जनतेला त्याचा मोठा फायदा होत आहे असेही राज्यपालांनी आपल्या भाषणात नमुद केले होते. विविध योजनांच्या माध्यमातून सरकार अंतोदयापर्यंत पोचत आहे. अडचणीच्या काळातही सरकारने जनतेला मोठा दिलासा दिला आहे. कोविडमुळे ज्यांचे निधन झाले त्यांच्या कुटुंबियांना 2 लाख रुपये मदत देण्यात आली. तर ज्या मच्छिमारांची वादळामुळे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाली होती अशा 26 मच्छिमाराऱयांना सरकारने 25 लाख रुपये दिले आहेत. सरकारच्या कामकाजाचा व्यवस्थितपणे अभ्यास करून चांगले अभ्यासपूर्ण राज्यपालांनी भाषण केले होते त्यामुळे ते अभइनंदनास पात्र ठरतात असेही दाजी साळकर यांनी सांगितले.
उल्हास तुयेकर
सर्वसामान्य लोकांसाठी सरकारच्या अनेक योजना आहेत. लोक त्याचा फायदाही घेत आहेत. त्यातल्यात्या पंतप्रधान गरीब कल्याण योजना ही कोविड काळात फार महत्वाची ठरली आहे. सर्वत्र हाहाकार माजला होता. काही लोकांकडे पैसे नव्हते तर काही लोकांकडे पैसे असूनही धान्य मिळत नव्हते. सर्व सामान्य लोकांनी जगावे कसे असा प्रश्न निर्माण झाला होता अशा काळात केंद्र सरकारने गरीब कल्याण योजना सुरु करून लोकांना मोफत तांदुळ दिले आहेत. गेव्यात पाच लाखाहून अधिक लोकांनी या योजनेचा फायदा घेतला तर देशात 80 कोटी लोकांना आधार मिळाला. कोविड काळात मोठे संकट उभे राहिले होते. या संकटाला मात करण्यासाठी मोफत लस सुरु करण्यात आली. गोव्यात 12 लाख लोकांना त्याचा फायदा घेतला आहे. गोवा स्वतंत्र्याच्या 60 वर्षा निमित्त केंद्र सरकारने गोवा सरकारला 300 कोटी रुपये दिले होते. त्या पैशांचे प्रत्येक पंचायतीला वाटप करण्यात आले. राज्यातील निसर्गाचे आणि प्रदुषण नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने 50 इलेक्ट्रीक बसगाडय़ा कदंबा महामंडळाला दिल्या असून आणखीन 50 बसगाडय़ा दिल्या जातील असेही उल्हास तुयेकर यांनी सांगितले.
गणेश गावकर
राज्यपालांनी आपल्या अभिभाषणात सरकारचे अभिनंदन करताना एकूण 76 मुद्दे उपस्थित केले आहेत. सरकारच्या मुख्यमंत्री योजनेचा युवकांना मोठय़ा प्रमाणात फायदा होत असून आत्तापर्यंत 122 युवकांनी या योजनेचा फायदा घेऊन आपला व्यवसाय सुरु केला आहे. सरकारचे अनेक योजना जनतेच्या फायद्याचे आहेत. त्यातल्यात्या सरकारने खाणी लवकरात लवकर सुरु कशा करता येईल याकडे लक्ष द्यावे खाण व्यवसायातून येणारा निधीमुळे सरकारला मदत होईल. आरोग्या बाबत सरकारने भरीव काम केले आहे. दिन दयाळ योजना लोकांसाठी मदतगार ठरत आहे. गोमेकॉत सुपर स्पेशॅलीटी हॉस्पिटल सुरु करण्यात आले आहे. सरकारचे उपक्रम सर्वसामान्य लोकांच्या उपयोगाचे आहेत असे सांगताना राज्यपालांनी सरकारचे मुक्तकंठाने अभिनंदन केले असल्याचे गणेश गावकर यांनी सांगितले.
दिव्या राणे
राज्यातील रस्ते आणि पर्यटनासाठी इतर साधान सुविधा सरकारने उपलब्ध केल्या आहेत. केंद्र सरकारकडून त्यासाठी मोठय़ा प्रमाणात निधी मिळाला आहे. केंद्राकडून गोव्याला वेळोवेळी मदत मिळत असल्याने पंतप्रदान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद व्यक्त केले तसेच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या कार्याबाबत त्यांचे अभिनंदन केले आहे. सत्तरी भागातील महिलांसाठी स्वातंत्र छोटे मोठे व्यवसाय सुरु करण्यासाठी 0 टक्के व्याजाने सरकारने कर्ज द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच महिलांना पोलीस खात्यात माठय़ा प्रमाणात घ्यावे आत्म निरभर भारत आणि स्वयंपूर्ण गोवा करण्यासाठी त्याचा मोठा फायदा होईल असे दिव्या राणे यांनी सांगितले.
दिलायला लोबो
आमदार दिलायला लोबो यांनी अभिभाषण अभिनंदन ठरावाला विरोध केला आहे. त्या म्हणाल्याकी कोविडच्या दुसऱया लाठेत 1800 लोकांचा मृत्यू झाला आहे. गोमेकॉत ऑक्सीजन सिलींडर नव्हते त्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील गृहखाते कोडमोडले असून पोलीस मनमानी कारभार करीत आहेत. किनारपट्टी भागात वाहतूक पोलीस पर्यटकांची सतावणूक करीत आहेत. राज्यात अमली पदार्थ प्रकरणे मोठय़ाप्रमाणात वाढत असून पोलिसांना त्याचा मुख्य सूत्रधार मिळत नाही. हे सरकराचे अपयश आहे. शैक्षणिक क्षेत्रात सावळा गोंधळ सुरु आहे. सरकारच्या प्राथमिक शाळेच्या रिसरात मोबाईल टॉवर उभारण्याचा प्रयत्न होत असून लोक त्याला विरोध करीत आहेत. असेही त्यांनी सांगितले बेकरी वाढत आहे. त्यात महागाई गगनाला भिडली आहे. योजना आहेत मात्र त्याचा फायदा जनतेला होत नाही. गृह आधार योजनेते पैसे सहा महिने झाले तरी मिळत नाही. लाडली लक्ष्मी योजनेची तीच गत आहे. पिण्याच्या पाण्याच्या नियमित समस्या तर आहेतच. टॅक्सी व्यवसाय करून पोट भरणाऱया लोकांच्या पोटावर पाय ठेवण्याचे काम सरकार करीत आहेत. स्वयमपूर्ण मित्र योजना आहे मात्र त्याचा फायदा जनतेला होतो काय असा प्रश्न दिलायला लोबो यांनी उपस्थित केला. योजनेची पुस्तिक काढून घरोघरी वाटावी असी सूचनाही त्यांनी केली.
आलेक्स सिक्वेरा
गोवा हे पर्यटक स्थळ म्हणून प्रसिध्द आहे. मात्र गोव्यात पर्यटकांची लुट होत असल्याचे आलेक्स सिक्वेरा यांनी सांगितले. पर्यटकांचे अपहरण करून खंडणी वसूल केल्याची अनेक उदाहरणे आहेत. बाल्तकार, खून वाढत असून भ्रष्टाचार फोफावलेला आहे. मायणा कुडतरी पोलीस स्थानकात कोणत्याच साधन सुविधा नाही त्यातच पोलीस काम करीत आहे. पोली यंत्रणा सुधारणे गरजेचे आहे असा सल्ला आलेक्स सिक्वेरा यांनी दिला. वेर्णा येथे सरकार एक लाख चौरस मिटर जागेत कचरा प्रकल्प उभारण्यात येणार असल्याचे सांगत आहे. प्रत्येक्षात सरकारने 50 हजार चौरस मिटर जागा ताव्यात घेतली असून आणखीन त्या ठिकाणी जागा नाही अशा स्थितीत सरकार जागा कुठून आणणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
ऍल्टन डिकॉस्ता
येत्या पंचायत निवडणूकीत ओबीसीला आरक्षण मिळणार की नाही याचा काहीच पत्ता नाही. ओबासीला निवडणूकीपासून मुकावे लागले तर त्याला जबाबदार सरकार असणार असल्याचे ऍल्टन डिकॉस्ता यांनी सांगितले. खाणी केव्हा सुरु होतील त्याचाही पत्ता नाही. सरकारच्या सर्वच योजनांचे तीन तेरा वाजले आहेत. पाच ते सहा महिने जाले गृहआधार योजनेचे पैसे मिळत नाही. महिला आशेने वाट पाहत आहेत. निवडणूकीपूर्वी दहा हजार नोकऱया देण्याचे आमीश सरकारने युवकांना दाखविले मात्र निवडणूक झाल्यानंतर या नोकऱया कुठे गेल्या त्याचाही काही पत्ता नाही. रस्त्यावर खड्डे की खड्डयात रस्त तेच कळत नाही. गोवा सरकार कारखानदारांच्या हितासाठी काम करीत आहे असेच दिसून येत आहे. गोवा विकू नका तर गोमंतकीयांसाठी गोवा ठेवा. नद्यात मोठय़ा प्रमाणात प्रदुषण होत आहे. समुद्र किनाऱयावरही तीच परिस्थिती आहे. समुद्र किनारे सांभाळणे गरजेचे आहे, अन्यथा पर्यटन व्यवसाय संकटात येणार आहे.
संकल्प आमोणकर
गोवा सुरक्षीत असल्याने पर्यटक गोव्यात येतात आज खून चोऱया बलात्कार मोठय़ा प्रमाणात वाढले आहेत असे संकल्प आमोणकर यांनी सांगितले. कऱयांचे ढीगारे वाढत आहेत. रस्त्यावर खड्डे वाढल्याने अपघातांना निमंत्रण मिळत आहे. राष्ट्रीय क्रिडा स्पर्धा कुठे गेल्या ते माहिती नाही. राज्या कोळस्याची वाहतूक होत असल्याने सगळीकडे कोळसाच झाला असून प्रदुषण वाढले आहे.