कुंभारजुवे /प्रतिनिधी
सारमानस- टोक जल मार्गावरील फेरीबोटीत वेळेत येऊन फेरीबोटीत घुसून दुचाकी गदी? केल्यांने, फेरीबोटसाठी पुर्वीच येऊन रांगेत राहिलेल्या चारचाकी वाहनानां फेरीबोटीत जागा मिळणे कठीण बनते.हा प्रकार प्रत्येक फेरीबोट धक्क्याला लागतेवेळी घडत असल्याने चारचाकी वाहनानां किमान तासभर फेरीबोटीत नंबर लावण्यासाठी वाट पाहावी लागते. याप्रकरणी दुचाकी वाहनचालकांच्या मनमानीपुढे फेरीबोट कर्मचारी हतबल होत असतात परिणामी या जलमार्गावर येजा करणारे चारचाकी वाहनचालक तीव्र नाराजी व्यक्त करीत आहे.
टोंक ते सारमानस- हा उत्तर व दक्षिण जिह्याला कमी वेळात जोडणारा महत्त्वाचा जलमार्ग आहे त्यामुळे या जलमार्गावरुन दुचाकी व चारचाकी वाहने मोठय़ा प्रमाणात येजा करीत असतात. त्यामुळे याइथे दोन्ही बाजूंनी (टोंक व सारमानस) चारचाकी वाहने ओळीने फेरीबोटीसाठी थांबलेली असतात. परंतु या फेरीबोटीतुन दररोज येजा करणार्या दुचाकी वाहनचालकांना फेरीबोटीची येण्यांजाण्यांची वेळ माहीत असल्याने बरोबर फेरी धक्क्याला लागायच्या काही वैळ आधी बरोबर येऊन, फेरीबोटीतुन एका बाजूने वाहने बाहेर काढतानाच, फेरीबोटीत दुचाकी स्वार आपली वाहने स्पर्धा लावून घूसवतात. त्यामुळे फेरीबोट दुचाकीनेच भरुन जाते आणि सुदैवाने एक किंवा दोन चारचाकी वाहनानां फेरीबोटीत प्रवेश मिळतो. या मार्गावर दर पंधरा मिनिटात फेरी धक्क्याला लागते तरी सुद्धा दुचाकी वाहनाचालकांच्या मनमानी कारभारामुळे चारचाकी वाहनानां तासनतास ताटकळत राहावे लागते. विशेषतः सकाळच्या सत्रात व संध्याकाळी हा प्रकार चालुच असतो या दिवसात गणेश चतुर्थी असल्याने त्यात आणखीन भर पडलेली आहे. आणि यावर कुणाचाच अंकुश नाही.त्यामुळे दुचाकी स्वारांची मनमानी कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत आहे
या फेरीबोटीचा जलमार्ग तीन मतदारसंघात येतो. टोंक प्रियोळ मतदारसंघात, सांतईस्तेव्ह कुंभारजुवे मतदारसंघात, व सारमानस मये मतदारसंघात येते. आणि या फेरीबोटीमागे? या मतदारसंघातील लोक , व वाहनचालक प्रवास करतातच शिवाय गोव्याच्या अन्य भागातुन व अगदी महाराष्ट्रातून म्हणजे दोडामार्ग व तिथल्या अन्य परिसरातील वाहनचालक दररोज नोकरी व अन्य कामांसाठी येजा करतात.
परंतु या दोन्ही फेरी धक्क्यावर कुणांचेच नियंत्रण नाही. त्यामुळे विशेषतः चारचाकी वाहनानां खुपच मनस्ताप सहन करणे नित्याचेच झाले आहे.
तरी प्रियोळ, कुंभारजुवे, व मये मतदारसंघातील आमदारांनी याप्रकरणी अधिक लक्ष घालून इथे होणाऱया सावळय़ांगोंधळावर लक्ष घालून चारचाकी वाहनाचालकांना होणांरा मनस्ताप लवकर दूर करावा अशी वाहनचालकांची आग्रही मागणी आहे.