वार्ताहर /खानापूर
खानापूर तालुक्मयातील प्रत्येक विद्यार्थ्याला उत्तम शिक्षण व आरोग्य लाभण्यासाठी आपले नेहमी प्रयत्न आहेत. तालुक्याच्या सर्वांगीण विकासाबरोबर शैक्षणिक क्षेत्रालाही बळ देण्याचा आपला प्रयत्न आहे. 2017-18 मध्ये तालुक्मयातील सर्व शालेय विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले होते. यावषी फाऊंडेशनच्यावतीने सर्व विद्यार्थ्यांना उत्तम प्रतीच्या स्कूल बॅग देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. खानापूर तालुक्मयात यावषी पहिली ते दहावीपर्यंत सर्व विद्यार्थी आहेत. शिवाय पदवी कॉलेजमध्येही शिकणाऱया महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना तसेच सर्व शिक्षक वर्गालाही स्कूलबॅग वितरित करण्याचा निर्णय फाऊंडेशनने घेतला आहे.
यावेळी नगराध्यक्ष मजहर खानापुरी, स्थायी समिती चेअरमन लक्ष्मण मादार यासह अनेकांनी फाऊंडेशनच्या या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. सदस्या सावित्री मादार, कासीम हट्टीहोळी यांनीही आपापले विचार मांडले.
यावेळी नगरपंचायतीचे नगरसेवक, नगरसेविका, शिक्षण खात्याचे अधिकारी डॉक्टर अंजलीताई फौंडेशनचे कार्यकर्ते व शालेय विद्यार्थी मोठय़ा प्रमाणात उपस्थित होते.