सावंतवाडी/प्रतिनिधी-
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ग्रामपंचायत आजगाव विविध कार्यक्रमातून देशभक्तीविषयक प्रेरणा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. 15 ऑगस्ट 2022 रोजी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने दुपारी 2.30 वा. शालेय विद्यार्थ्यांत देशभक्तीविषयक जाणीव जागृतीसाठी देशभक्तीपर समुहगीत स्पर्धेचे आयोजन केले आहे. तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तीत जास्त शाळांनी दि.13 ऑगस्ट 2022 पर्यंत नावनोंदणी करुन या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन सरपंच व सर्व सदस्य ग्रामपंचायत आजगाव आणि ग्रामस्थ आजगावच्या वतीने केले आहे. स्पर्धेतील यशस्वी संघांना रोख रक्कम,प्रशस्तीपत्र आणि आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.*
स्पर्धेतील बक्षिसे खालीलप्रमाणे
1] प्रथम क्रमांक:- रोख रु.1500/- प्रमाणपत्र व चषक
2] द्वितीय क्रमांक:- रोख 1000/- व प्रमाणपत्र व चषक
3] तृतीय क्रमांक:- रोख 500/- प्रमाणपत्र व चषक
4] उत्तेजनार्थ क्रमांक:- रु.300/- प्रमाणपत्र व चषक (दोन बक्षिसे)
1)देशभक्तीपर समुहगीत स्पर्धेसाठी गीत देशभक्तीपरच असावे.
2)एका शाळेचा एकच संघ सहभागी होऊ शकतो.
3) स्पर्धेसाठी फक्त तबला, पेटी,ढोलकी, ढोलक, पखावज, बासरी…यासारखी पारंपारिक वाद्येच वापरणे बंधनकारक. इलेक्ट्रॉनिक वाद्ये वापरु नये.
4) समुहगीतातील एका गटात व्यासपीठावर 10 विद्यार्थीच सहभाग घेऊ शकतात.
5)शालेय गणवेशात गीत सादर करावे.
6)वाद्यवृंद संघाचा स्वतःचा असेल.
7) वादक विद्यार्थी, शिक्षक किंवा अन्य ग्रामस्थ वादक यांचा सहभाग घेऊ शकता.
8) परीक्षकांचा निर्णय अंतीम राहिल.त्यात कोणताही बदल होणार नाही.
9) आयोजकांचे नियम स्पर्धकांना बंधनकारक राहतील.
स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी किंवा नाव नोंदणीसाठी श्रीम.सुप्रिया वाडकर/मेस्री [सरपंच ग्रा.पं.आजगाव] मोबाईल क्रमांक 09420049738 किंवा श्री.संदीप गवस [ग्रामसेवक] आजगाव मोबाईल क्रमांक 09423513677 किंवा श्री. दत्तगुरु कांबळी सर 9421631204 यांच्याशी संपर्क साधावा. असे कळवण्यात आले आहे.