ऑनलाईन टीम / तरुण भारत :
राज्यात जिल्हानिहाय मेडिकल कॉलेज उभारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ (CM Eknath Shinde) शिंदे यांनी केली आहे.
एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, कोरोना काळात आपल्याला अनुभव आला होता की, राज्यात डॉक्टरांची संख्या कमी आहे. त्यामुळे मी राज्यात जिल्हानिहाय मेडिकल कॉलेज उभारण्याचा निर्णय घेतला. सरकारकडून काही चुकलं तर नक्की माध्यमांना सांगण्याचा अधिकार आहे. पण, सरकारने चांगलं काम केलं तेही आपण सांगणं गरजेचं आहे. 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण ही बाळसाहेबांची भूमिका घेऊन बाळासाहेबांची शिवसेना पुढे जात आहे.
अधिक वाचा : मुख्यमंत्र्यांच्या गुवाहाटी दौऱ्याची तारीख ठरली!
उद्योगधंदे राज्याबाहेर जाण्याच्या मुद्यावर बोलताना ते म्हणाले, 2-3 महिन्यात उद्योगधंदे राज्याबाहेर जात नाहीत. त्याला अनेक गोष्टी कारणीभूत असतात. आगामी काळात केंद्राच्या मदतीने राज्यात नक्कीच मोठे प्रकल्प येतील, रोजगार उपलब्ध होतील, असेही मुख्यमंत्री म्हणाले.