11 वा हप्ता केवायसी नसल्यास मिळणार नाही
नवी दिल्ली
पीएम किसान योजनेचा लाभ घेत असणाऱया लाभार्थ्यांना आता 31 मे च्या अंतिम तारखेपर्यंत केवायसी करावे लागणार आहे. यात केवायसी 31 मे नंतरही करता येणार आहे. मात्र 31 मे नंतर केल्यावर मिळणारा 11 वा हप्ता ई-केवायसी नसल्यामुळे थांबण्याची शक्यता आहे.
शेतकरी दोन तारखेपासून पीएम किसानसाठी ई-केवायसी पूर्ण करु शकतात. यामध्ये शेतकऱयांना आपल्या जवळच्या सीएससी केंद्रावर (कॉमन सर्व्हिस सेंटर) जाऊनही केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येते. याव्यतिरिक्त ई-केवायसी घर बसल्याही करता येते. याकरीता पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटच्या आधारे केवायसी होऊ शकते.