रमेश वंसकर यांचे उद्गार
सांस्कृतिक प्रतिनिधी /फोंडा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाच्या सर्वभौमत्वाला प्राधान्य दिले. एकता, समता, आणि बंधूभाव नजरेसमोर ठेवून त्यांनी राज्यघटना तयार केली. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि विश्व मानवतेचे महानायक असलेले आबेडकर राष्ट्रभक्त होते. समृद्ध भारताचे स्वप्न त्यांनी पाहिले. दूरदृष्टी आणि प्रखर बुद्धिमत्ता याचा प्रत्यय देणारी त्यांची उज्वला कारकीर्द होती असे उद्गार गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे अध्यक्ष रमेश वंसकर यांनी काढले.
मागास जातीय संघटनतर्फे यशवंतनगर-फोंडा येथे आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष संतोष बांदेकर, बालक सातर्डेकर, ज्ञानेश्वर कवळेकर, मुकेश कवळेकर यांची उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे रमाकांत हळर्णकर यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा आढावा घेतला. बाबासाहेबांनी निर्मिलेली राज्यघटना भारतीय लोकशहीसाठी आश्वासक आणि संजिवक असल्याचे ते म्हणाले. वासुदेव कुडाळकर, शोभा माणगांवकर, बालक सातर्डेकर यांचीही यावेळी भाषणे झाली. मान्यवरांच्याहस्ते दीपप्रज्वलीत करुन व बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. संतोष बांदेकर यांनी स्वातग केले. हल्लीच दिवंगत झालेले स्व. भूपेश कवळेकर यांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष सातर्डेकर यांनी तर गोकुळदास कुडाळकर यांनी आभार मानले.