प्रतिनिधी/कोल्हापूर
पुणे विभागीय रेल्वे अंतर्गत राजेवाडी-जेजुरी- दौंड या रेल्वे स्टेशन दरम्यान 30 जून पासून दुहेरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. यामुळे या मार्गावरील काही रेल्वे गाडय़ावर परिणाम झाला आहे. कोल्हापूर-पुणे -कोल्हापूर ही पॅसेंजर गाडी 27 जुलै पर्यंत साताऱ्या पर्यंतच धावणार आहे. साताऱ्याच्या पुढे ही गाडी धावणार नाही. पुणे-सातारा- पुणे, पुणे-फलटण-पुणे, लोणंद-फलटण-लोणंद या गाडय़ा 30 जुलै पर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत असे रेल्वेचे पुणे विभाग जनसंपर्क अधिकारी यांनी कळवले आहे.