दैव बलवत्तर म्हणून जीवितहानी टळली
वार्ताहर /उचगाव
गेल्या आठ दिवसापासून सुरू असलेल्या जोरदार पावसाच्या तडाख्याने उचगाव लक्ष्मी गल्ली येथील घर कोसळून अंदाजे चार लाखाचे नुकसान झाल्याची घटना शनिवारी संध्याकाळी घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, लक्ष्मी गल्ली येथील शेतकरी किसन देसाई यांचे राहते घर गेल्या चार दिवसापासून चालू असलेल्या जोरदार पावसामुळे रात्री अचानक कोसळल्याने या दुर्घटनेत दैव बलवत्तर म्हणून सर्वांचे प्राण वाचले. कोणतीही जीवितहानी झाली नाही. तरी या घरामध्ये राहणारे किसन देसाई यांचे कुटुंब थोडक्मयात बचावले. सध्या भागामध्ये जोरदार पाऊस सुरू असल्याने पूर्वीची जुनी घरे धोकादायक बनली आहेत. सकाळी या घराची पाहणी केली असता संबंधित देसाई कुटुंबीयांचे हे घर कोसळल्याने त्या घरामध्ये राहणे कठीण झाले आहे. जोरदार पावसामुळे उर्वरित घरसुद्धा केव्हा पडेल हे सांगता येत नाही. त्यामुळे हे सर्व कुटुंब उघडय़ावर पडले आहे. तरी त्यांना शासनामार्फत योग्य भरपाई मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे. सकाळी या घराची पाणी ग्रामपंचायत अध्यक्ष जावेद जमादार व सदस्यांनी करून योग्य ती भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे या घटनेचा पंचनामा उचगाव गाव कामगारचे व्ही. एस. कोष्टी यांना करण्याचे सांगण्यात आले.
मागील वषीसुद्धा उचगाव परिसरामध्ये पावसामुळे मोठय़ा प्रमाणात घरे कोसळली होती व त्यांना शासनामार्फत निधी मंजूर करून देण्याचे जाहीर करण्यात आले होते. परंतु त्या संदर्भात सर्व कागदपत्रे, कोसळलेल्या घरांचे छायाचित्र संबंधित अधिकाऱयांना देण्यात आले होते. परंतु वर्षे उलटले तरी अद्याप त्यांना एक रुपयाही मंजूर झालेला नाही. त्यामुळे नागरिकांच्यात नाराजी पसरली आहे. आतातरी संबंधितांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.