प्रतिनिधी /खानापूर
तालुक्याच्या पश्चिम भागाचे टोक असलेल्या कणकुंबीसारख्या दुर्गम भागात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या दौडमध्ये युवक, युवती उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत. सकाळी 6 वाजता माउली मंदिर येथे ध्वजपूजन करुन दौडला प्रारंभ होत आहे. पहिले दोन दिवस गावातून दौड काढण्यात आली. त्यानंतर कणकुंबी येथून दौड सुरु करून पारवाड गावात सांगता करण्यात आली.
कणकुंबी येथे गावकऱयांनी दौडच्या स्वागतासाठी मार्गांवर रांगोळी, कमाणी, तोरणे, भगव्या पताक्मयांनी सजावट केली आहे. रोज सकाळी गावात मंगलमय वातावरण निर्माण होत आहे.
कणकुंबी येथील शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी यावर्षी दौडची सुरुवात केली आहे. कणकुंबी परिसरातील दुर्गम भागात दौड सुरु करून तो यशस्वी करण्याचा निश्चय धारकऱयांनी केला आहे. चिगुळे, पारवाड, चोर्ला, बेटणे, तळावडे, चिखले, मान, सडा या गावातूनही दौड काढण्यात येणार आहे.