तहसीलदारांनी लक्ष द्यावे ; विजय देसाई यांची मागणी
सावंतवाडी । प्रतिनिधी
वेत्ये येथून मुंबई राष्ट्रीय महामार्गावर क्रशरवरून खडी भरणारे डंपर ये-जा करीत असतात. त्यामुळे महामार्गावर वेत्ये येथे एक किलोमीटर परिसरात धुळीचे साम्राज्य पसरत असते. त्यामुळे वाहन चालकांना तसेच पादचारी यांना त्रास होत आहे .त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. महसूल प्रशासनाचे याकडे पूर्णतः दुर्लक्ष असून अपघात झाल्यास महसूल प्रशासन जबाबदार राहणार आहे. या ठिकाणी पसरणारी धूळ पाहता दिवसातून दोन वेळा पाणी मारण्याची गरज आहे. यासंदर्भात तहसीलदारांनी लक्ष द्यावे अशी मागणी शिवसेना विभाग प्रमुख विजय देसाई यांनी केली आहे.