पुणे- विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात पार पडलेल्या राज्यातील दहावी व बारावीचे निकाल २० जूनच्या आधीच विद्यार्त्याना कळणार आहेत इयत्ता १२ वीचा निकाल १० तर इयत्ता १० वीचा निकाल २० जूनपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. तशी माहितीच महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली आहे.
दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा फेब्रुवारी ते मार्च या कालावधीत पार पडली. त्याचे पेपर तपासणीचे काम देखील पूर्ण झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ आता दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या निकालाच्या तयारीला लागले आहे. साधारण १० जूनपर्यंत इयत्ता १२ वी तर दहावीचा निकाल २० जूनपर्यंत जाहीर केला जाईळ, अशी माहिती शिक्षण मंडळानं दिली आहे.
शिक्षकांच्या पेपर तपासणी बहिष्कारामुळे निकाल उशिरा लागण्याची चिंता विद्यार्थी आणि पालकांना होती. पण जून महिन्यातच दोन्ही परीक्षांचे निकाल लागणार असल्याची माहिती बोर्डाकडून दिली आहे. परीक्षेतील शेवटच्या पेपरच्या ६० दिवसांनंतर निकाल जाहीर करण्याची प्रमाणिक प्रक्रिया आहे. पण यावेळी इयत्ता बारावीची परीक्षा पंधरा दिवस उशिरा सुरू झाली होती. मात्र बारावीचा निकाल १० जूनपर्यंत जाहीर होईल, असं सांगण्यात आलं.