जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांचे आश्वासन
प्रतिनिधी/ सातारा
दिव्यांग घटकांना शासनाच्या योजनांचा लाभ कसा मिळवून देता येईल यासाठी माझे नेहमीच प्राधान्य राहिलेले आहे. सातारा जिह्यातील दिव्यांगांना समाजकल्याण विभागाच्या योजनांचा लाभ पुरेपुर कसा देता येईल याकरता प्राधान्य राहिल. शासनाच्या प्रत्येक विभागाचा अधिकारी हे दिव्यांगाप्रती संवेदनशील आहे. दिव्यांग
ाना सक्षम करण्यासाठी माझा नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे, अशी ग्वाही जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिली.
सातारा येथील दिव्यांग सामाजिक संस्थेच्या सभासदांना दानशुर व्यक्तीकडून दिवाळीचा फराळ दिल्याने त्याचे वाटप जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक बाळासाहेब खंदारे, संस्थेचे अजय पवार, शैलेंद्र बोर्डे, आनंदा पोतेकर यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी म्हणाले, दिव्यांग या घटकाकडे पाहण्याचा दृष्टीकोन समाजाचा वेगळा असतो. हा घटक उपेक्षित असतो. सर्व काही असूनही दिव्यांग असल्याने तो काहीच करु शकत नाही, अशी त्याची अवस्था असते. या घटकासाठी शासनाच्या माध्यमातून विविध योजना राबवण्यात येतात. या योजना आपल्या जिह्यात प्रभावीपणे राबवण्यात येतील. अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून या योजना राबवताना पूर्णपणे सहकार्य राहिल, अशी ग्वाही त्यांनी दिली.