ऑनलाईन टीम/तरुण भारत
शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) आणि ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (sushma andhare) यांच्यात मागील काही दिवसांपासून राजकीय कलगीतुरा रंगल्याने बघायला मिळते आहे. दरम्यन, ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची गुलाबराव पाटलांच्या मतदारसंघात सभा आयोजित केली होती. परंतु पोलिसांनी त्यांच्या सभेला परवानगी नाकारली. त्यामुळे सुषमा अंधारेंनी ऑनलाईन पद्धतीने सभा घेत शिंदे गटाच्या गुलाबराव पाटलांवर जोरदार टीका केली. सुषमा अंधारेंना प्रत्युत्तर देताना मंत्री गुलाबराव पाटलांनीची जीभ घसरली.
दरम्यान, गुलाबराव पाटील यांनी दबावामुळेच आपल्या सभेला परवानगी मिळाली नाही”, असा आरोप त्यांनी केला होता. या आरोपानंतर गुलाबराव पाटलांनी प्रत्युत्तर देताना सुषमा अंधारेंचा उल्लेख ‘नटी’ असा केला. “सुषमा अंधारेंना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो. त्यांचा पिक्चर (चित्रपट) कुठेच चालला नाही, त्यामुळे त्या शिवसेनेत आल्या. ठाकरे गटालाही नटीची गरज होती” असं विधान गुलाबराव पाटील यांनी केले होते.
हे ही वाचा : शिंदे गट पुन्हा गुवाहाटीला जाण्याच्या तयारीत
“मला माझा जिल्हा ओळखतो. त्यांनाही महाराष्ट्र ओळखतो. त्यांचा कुठेही पिक्चर चालला नाही म्हणून ठाकरेंना त्यांच्या पिक्चरमध्ये नटीची गरज होती. ज्याप्रमाणे पिक्चरमध्ये एखादी बाई पाहिजे, त्याप्रमाणे आमच्या पिक्चरमध्ये या बाईला आणले. सुषमा अंधारे यांना मुंबई महापालिका निवडणुकीसाठी लाडू दिला आहे, म्हणून त्या फिरत आहे” असा शब्दांत मंत्री गुलाबराव पाटील यांनी उध्दव ठाकरे तसेच अंधारे यांच्यावर केला. तसेच सुषमा अंधारेंना मुंबई महापालिकेसाठी लाडू दिलेला आहे म्हणून त्या फिरत असल्याची टीकाही गुलाबराव पाटील यांनी केली आहे.
सुषमा अंधारेंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी अंधारेंचा नटी असा उल्लेख केला. यांनतर गुलाबराव पाटलांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यात येत आहे. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर “सुषमा अंधारे या नेहमीच व्यापक दृष्टीकोन ठेऊन बोलत असतात. बाकी कोणाकडे किती नट्या आहेत, हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे या विषयावर न बोललं बरं. मात्र, एका स्त्रीचा मान-सन्मान आपण ठेवला पाहिजे”, अशी प्रतिक्रिया आमदार यशोमती ठाकूर यांनी दिली आहे. तसेच “गुलाबराव पाटलांना मी चांगलं ओळखते. ते सद्सद्विवेक बुद्धी ठेऊन नेहमी बोलत असतात. मात्र, त्यांनी हे विधान कसं केलं, याचे कारण समजण्यापलीकडे आहे”, असेही त्या म्हणाल्या.