ऑनलाईन टीम/ तरुण भारत
देवेंद्र फडणवीस यांनी मनाचा मोठेपणा दाखवून शिवसैनिकाला मुख्यमंत्री केले. यावेळी त्यांनी फडणवीसांचे आभार मानले. ५० आमदार वेगळी भूमिका घेतात, ग्रामपंचायचीचे सदस्य विरोध करतात म्हणजे आत्मपरिक्षणाची गरज आहे असा टोला महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उध्दव ठाकरे यांनी लगावला.
हे सरकार कोणत्याही पदासाठी नसून फक्त हिंदुत्व या विचारसरणीसाठी स्थापन केलं आहे. संख्याबळ असतानाही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दुसऱ्याला मुख्यमंत्रीपद दिलं. राजकारणात अशी दुर्मिळ माणसे असतात. त्यांच्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी माझ्य़ासारख्या सामान्य आणि विशेषत: बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला संधी दिल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानले.
पुढे बोलताना ते म्हणाले, महाराष्ट्रात एक मजबूत सरकार स्थापन करण्यासाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने पाठबळ दिलं. त्यामुळे राज्यात भक्कम सरकार स्थापन होत आहे. मी हिंदुत्वाचा विचार पुढे घेऊन जाणार आहे. अहोरात्र काम करुन राज्याचा विकास करु. मविआ सरकारमध्ये मर्यादा होत्या अशी खंत त्यांनी व्यक्त केली. कालच्या नामांतराच्या निर्णयाचं स्वागत असल्याचेही ते म्हणाले. आज संध्याकाळी साडेसात वाजता ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. मात्र देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात सहभागी होणार नाहीत.