ऑनलाईन टीम/तरुण भारत
एकीकडे महाराष्ट्रात सत्तानाट्य सुरु असतानाच आता राज्य निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातील 62 तालुक्यातील 271 ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर केली आहे. यामुळे पुढील महिना या ग्रामपंचायत हद्दीत रणधुमाळी गाजणार आहे. आयोगानं याबाबतचं परिपत्रक जारी केले आहे. चार ऑगस्ट रोजी मतदान, तर पाच ऑगस्टला मतमोजणी होणार आहे. राज्यात 28,813 ग्रामपंयायती आहेत.
हेही वाचा-बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला उद्या भेट देणार; एकनाथ शिंदेंची घोषणा
कसा आहे निवडणूक कार्यक्रम –
तहसिलदारांनी निडणुक नोटीस प्रसिद्ध करण्याचा दिनांक – 5 जुलै 2022 (मंगळवार ).
नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक व वेळ – 12 जुलै 2022 ते 19 जुलै 2022 पर्यंत… वेळ सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत.
नामनिर्देशनपत्र छाननी करण्याचा दिनांक – 20 जुलै 2022.
नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक – 22 जुलै 2022.
निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदरांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक – 22 जुलै 2022 (दुपारी तीन नंतर).
आवश्यक असल्यास मतदानाचा दिंनाक – 4 ऑगस्ट 2022.
मतमोजणी व निकाल घोषित करण्याचा दिनांक – 5 ऑगस्ट 2022.
हेही वाचा- मलिक, देशमुख पुन्हा कोर्टात; बहुमत चाचणीत मतदानासाठी मागितली परवानगी
कोणत्या जिल्ह्यात किती ग्रामपंचायचीच्या निवडणूका –
नाशिक : 40
धुळे : 52
जळगाव : 24
अहमदनगर : 15
पुणे : 19
सोलापूर : 25
सातारा : 10
सांगली : 1
औरंगाबाद : 16
जालना : 28
बीड : 13
लातूर : 9
उस्मनाबाद : 11
परभणी : 3
बुलढाणा : 5