बेळगाव प्रतिनिधी – सीमा भागामध्ये मराठी भाषिक मोठ्या संख्येने एकत्र राहतात, त्यामुळे कायद्यानुसार मराठीत परिपत्रके देणे बंधनकारक आहे. असे असताना कर्नाटक सरकार टाळाटाळ करत आहे. त्यामुळे मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन छेडण्यात आले. भर पावसातील मोठ्या संख्येने महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. बेळगाव शहर, खानापूर आणि तालुक्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. पावसामुळे काही कार्यकर्त्यांना येऊ नका असा सल्ला देण्यात आला. तरी देखील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Trending
- मोठ्या प्रमाणात मतदान करून मतदारांनी लोकशाहीचा उत्सव लोकोत्सव करावा
- ही स्वाभिमानाची लढाई ! बाजीराव खाडेंचं बंड…उमेदवारी अर्ज भरताना अश्रू अनावर
- रत्नागिरीत नारायण राणेंच्या समर्थनार्थ रॅलीला सुरुवात !
- नारायण राणे थोड्याच वेळात दाखल करणार उमेदवारी अर्ज !
- जिल्हा परिषदेच्या लेखाधिकाऱ्याचे अपहरण करुन मारहाण ! कनिष्ठ लिपिकासह ८ जणांना अटक
- विजय सरदेसाई हे ‘कटाप्पा’
- 99 टक्के कामे पाच वर्षांत होणार पूर्ण
- आरजीपीचे रूबर्ट, मनोज यांचे अर्ज सादर