कृषीमंत्री तोमर यांचे प्रतिपादन
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
शेतकऱयांकडून उत्पन्न आणि उत्पादन वाढविण्यासाठी बीयांसोबत विविध प्रयोग करण्यासह त्याला तंत्रज्ञानाची जोड देण्यावर आगामी काळात भर देण्याची गरज असल्याचे कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी स्पष्ट केले आहे.
स्वातंत्र्यांच्या 75 व्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून 25 ते 30 एप्रिल 2022 च्या दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ‘शेतकरी भागीदारी, प्राथमिकता आमची’ या अभियानाच्या निमित्ताने ते बोलत होते.
शेतकऱयांसोबत चर्चा
मंत्री तोमर यांनी विविध राज्यांमधील कृषी विज्ञान केंद्रांमध्ये उपस्थित असणाऱया शेतकऱयांसोबत चर्चा केली आहे. यावेळी त्यांनी शेतकरी व सरकार यांच्यात प्रमुख योजनांसंदर्भाचा आढावा घेतला आहे.