कृषी अधिकारी विश्वनाथ गावस यांची माहिती : कृषी खात्यातर्फे शेतकऱयांना मोफत बी बियाणे वाटप
प्रतिनिधी /वाळपई
प्रत्येक गावांमध्ये महिलांनी पुढाकार घेऊन पारंपरिक भाजी लागवडीवर भर दिल्यास गोवा भाजी उत्पादनात स्वयंपूर्ण असेल तसेच आत्मनिर्भर भारत व स्वयंपूर्ण गोवा ही संकल्पना गतीने पुढे जाऊ शकेल. यासाठी कृषी खात्याने विशेष भर दिला असून सत्तरी तालुक्मयाच्या प्रत्येक ग्रामीण भागात महिलांना जागृत करून पारंपरिक भाजी लागवडीवर भर देण्यात येणार असल्याची माहिती कृषी खात्याचे विभागीय कृषी अधिकारी विश्वनाथ गावस यांनी दिली.
आतापर्यंत अनेक गावांमध्ये स्वयंसहाय्य गट, महिला मंडळे एकसंघ करून त्यांना भाजी लागवडीचे महत्त्व पटवून देण्यात येत आहे. त्याला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद लाभत आहे. आतापर्यंत 40 गावांमध्ये अशा प्रकारच्या बैठका आयोजित करून त्यांना मोफत बी बियाणे व खत वितरण केले असून अनेकांनी भाजी लागवड सुरू केलेली आहे असे यावेळी गावस यांनी सांगितले.
आत्मा योजनेंतर्गत ही भाजीपाला लागवड करण्यात येणार आहे. यासाठी मासिक भाजीपाला लागवड ही नवीन संकल्पना राबविण्यात येणार असून यातून मोठय़ा प्रमाणात भाजीची लागवड होण्याची अपेक्षा गावस यांनी व्यक्त केली आहे.
असोडे येथे महिलांना मार्गदर्शन
या संदर्भात एक महत्त्वाची बैठक खोतोडा पंचायत क्षेत्रातील असोडे गावामध्ये झाली. या ठिकाणी महिलांना विशेष मार्गदर्शन करण्यात आले. सहा दिवस घेतलेल्या कार्यशाळेत वेगवेगळय़ा भाजी लागवडीबाबत प्रशिक्षणाचा शेतकऱयांनी लाभ घेतला. त्यावेळी आदित्य राणे, तृप्तेश गावडे, वाळपई कृषी अधिकारी विश्वनाथ गावस, आत्माचे पृथ्वीराज नाईक, रमेश गावकर, अनिरुध्द गावठणकर, सेल्फ हेल्प ग्रुपच्या वृंदा गावकर यांची उपस्थिती होती.
तालुक्यातील 30 शेतकऱयांना बियाणांचे वाटप
पारंपरिक भाजी लागवडीसाठी अनेक महिलांनी तयारी दर्शविली असून त्यांना एकूण 30 शेतकऱयांना मुळा, तांबडी भाजी तसेचे इतर बी-बियाणांचे मोफत वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे त्यांना खत वितरण करण्यात आले आहे.
येण्याऱया दिवसात कृषी खात्यातर्फे सत्तरीच्या वेगवेगळय़ा गावात अशी कार्यशाळा आयोजित करुन मार्गदर्शन केले जाईल. त्यामुळे या संधीचा फायदा शेतकऱयांनी करुन घ्यावा असे आवाहन गावस यांनी केले.
कृषी खात्याचे कार्य कौतुकास्पद : गावकर
कृषी खात्याने राबविलेले कार्य खुपच कौतुकास्पद आहे. त्यामुळे त्यांच्या योजनेचा फायदा शेतकऱयांनी योग्य पध्दतीने करून घ्यावा, असे आवाहन यावेळी सेल्फ हेल्प ग्रुपच्या वृंदा गावकर यांनी केले.