उमेश झिरपे यांचे प्रतिपादन : वसंत व्याख्यानमालेचे गुंफले दुसरे पुष्प
प्रतिनिधी / बेळगाव
भारतातील गिर्यारोहकांसाठी एव्हरेस्ट ही सर्वात मोठी मोहीम आहे. गिर्यारोहण म्हणजे काय? हे बऱयाच जणांना माहीत नसले तरी गिर्यारोहणासाठी जिद्द, चिकाटी आणि धाडस आवश्यक आहे. गिर्यारोहणाची व्याख्या मोठी आहे. डोंगरावरील भटकंतीपासून या खेळाची सुरुवात होते, असे विचार पुणे येथील उमेश झिरपे यांनी मांडले.
गुरुवारी हेरवाडकर शाळेत आयोजित वसंत व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफताना ‘गिर्यारोहण : एक जीवनशैली’ या विषयावर ते बोलत होते. व्यासपीठावर अध्यक्षा प्रा. मीना खानोलकर, उपाध्यक्षा प्रा. स्वरुपा इनामदार उपस्थित होत्या. प्रास्ताविक प्रा. मीना खानोलकर यांनी केले. परिचय आसावरी भोकरे यांनी करून दिला.
उमेश झिरपे पुढे म्हणाले, गिर्यारोहणाची सुरुवात डोंगरातील भटकंतीतून होते. हा अवघड खेळ असला तरी आम्ही लिलया पार केला आहे. हिमालयात वाऱयाचा वेग अधिक असल्याने प्रवास खडतर असतो. त्यामुळे हिमालयातील मोहिमा अवघड असतात. हिमालयात जाण्याचा वेगळा अनुभव असतो. एकदा माणूस हिमालयात गेला तर तो त्याच्या प्रेमात पडतो, हा हिमालयाचा अनुभव आहे.
चित्रिकरणामुळे गिर्यारोहणाची अवघड चढाई सगळय़ांना समजायला मदत होत आहे. हेतू स्वच्छ असेल तर समाज मागे उभा राहतो. पाच रुपये ते 1 लाखापर्यंत मदत मिळू शकते. हिमालयात कृत्रिम ऑक्सिजनची मदत घेऊन गिर्यारोहण करणे अवघड आहे. या स्थितीत शारीरिक ताकद आवश्यक आहे.
कर्तृत्ववानांचा सत्कार यावेळी रसिक महिला उपस्थित होत्या. आसावरी भोकरे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. यावेळी वसंत व्याख्यानमालेच्या कर्तृत्ववान व उल्लेखनीय कार्य केलेल्या आशा कुलकर्णी, सुनीता पाटणकर, प्रियांका केळकर, शिल्पा लांडगे, अरुण कुलकर्णी, नीता नाडकर्णी, आसावरी भोकरे आदी सभासदांचा व्याख्याते उमेश झिरपे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.