म्हैसूरचे राजवंशज वडेयर यांचे प्रतिपादन
वार्ताहर / नंदगड
देशात सर्वांना दृष्टीला पडणारे आश्चर्यकारक अरण्य, जैव विविधता आपल्या राज्यात आहे. त्याची जोपासना भावी पिढीसाठी करणे प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे
मत म्हैसूरचे राजवंशज यदुवीर कृष्णदत्त चामराज वडेयर यांनी व्यक्त केले.
कर्नाटक अरण्य विकास निगम सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने बेंगळूर येथील कंठीरव्वा क्रीडांगणावर आयोजित केलेल्या क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमावेळी ते बोलत होते. कर्नाटक अरण्य निगमच्या अध्यक्षा तारा अनुराध बोलताना म्हणाल्या, जंगलाच्या सुरक्षिततेसाठी स्थापन करण्यात आलेले निगम गेल्या पाच दशकापासून हजारो एकर जंगल वाचविण्यासाठी यशस्वी झाले आहे. सुवर्ण महोत्सवानिमित्त निगमने विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले आहे, असे सांगितले.
यावेळी अरण्य निगमचे उपाध्यक्ष रेवण्णप्पा, संचालक सुरेश देसाई, व्यवस्थापक राधादेवी आदीसह विविध भागातून मान्यवर व अरण्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.