वार्ताहर/ आंबोली-
आंबोली फौजदारवाडी येथील माजी सैनिकाचा पाण्यात बुडून मृत्यु झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी साडे तीन वाजण्याच्या सुमारास येथील स्मशानशेड परीसरात चर( इडीची)कोंड परिसरात घडली. जाळे घेऊन मासे पकण्यासाठी गेले असता घडली घटना.
फौजदारवाडी येथील माजी सैनिक सुभाष काशिराम परब वय ४६ हे आर्मीत होते. त्यांनी चार पाच वर्षापूर्वी स्वेच्छेने सेवानिवृती घेतली होती. ते सेवा निवृत झाल्यानंतर घरीच असत मध्यंतरीच्या काळात त्यांनी वाचमनची नोकरी केली होती. सुभाष परब हे शुक्रवारी दुपारी साडे तीन वाजणेच्या सुमारास माशाचे जाळे घेऊन माशे पकडण्यासाठी फौजदारवाडी शेजारी असणाऱ्या स्मशानशेड परीसरातील चर (इडीची) कोंड परीसरात माशे पकडण्यासाठी गेले असता पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाले.