एकापाठोपाठ एक उघडकीस : घोटाळय़ांमुळे गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय, केपीटीसीएल घोटाळय़ाचा विस्तार मोठा
प्रतिनिधी /बेळगाव
केपीटीसीएल परीक्षा घोटाळय़ाचा विस्तार वाढत चालला आहे. सुरुवातीला केवळ एका गोकाक तालुक्मयापुरते हे प्रकरण मर्यादित होते. आता गदगपर्यंत त्याचे धागेदोरे पोहोचल्याचे उघडकीस आले आहे. गोकाक पोलिसांनी आतापर्यंत 14 जणांना अटक केली आहे. ही धरपकड अद्याप पूर्ण झालेली नाही. आणखी काही संशयितांना लवकरच अटक होणार आहे.
बेळगाव जिल्हय़ातील 55 परीक्षा केंद्रांवर दि. 7 ऑगस्ट 2022 रोजी केपीटीसीएल ज्युनियर असिस्टंट भरतीसाठी परीक्षा झाली. या परीक्षेत गोकाक येथील जेएसएस पदवीपूर्व कॉलेजमध्ये एका परीक्षार्थीने स्मार्टवॉचचा वापर करून कॉपी केल्याचे आढळून आले. प्रश्नपत्रिकेचे फोटो टेलिग्राम ऍपच्या माध्यमातून त्याने आपल्या मित्राला पाठविले. त्यानंतर ज्यांनी ज्यांनी आर्थिक व्यवहार केले आहेत, त्यांना उत्तरे पुरविण्यात आली.
दोन दिवसांपूर्वी संजीव लक्ष्मण भंडारी (वय 24) मूळचा राहणार अरभावी, सध्या राहणार घटप्रभा याला हुबळी पोलिसांच्या मदतीने अटक करण्यात आली आहे. हुक्केरी तालुक्मयातील शिरहट्टी बी. के. येथील एका फार्महाऊसमध्ये बसून संजीवने परीक्षार्थींना उत्तरे पुरविली आहेत. यासाठी ब्ल्यू टूथ डिव्हाईसचा वापर करण्यात आला आहे. संजीव पाठोपाठ गिरियप्पा ऊर्फ गिरीश फकिरप्पा बनाज (वय 22) राहणार अरभावी या ज्युनियर लाईनमनलाही अटक झाली आहे.
पीएसआय परीक्षा घोटाळा असो, पोलीस भरतीसाठी होणारी परीक्षा असो, लाखो रुपयांचे आर्थिक व्यवहार करून परीक्षार्थींना उत्तरे पुरविण्याचे काम या टोळीतील महाभाग करतात. प्रत्येक परीक्षा घोटाळय़ात गोकाक व मुडलगी तालुक्मयांची नावे ठळक चर्चेत येतात. परीक्षार्थींना मदत करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली जाते. गेल्या महिन्यात झालेल्या परीक्षेतही या घोटाळेबाजांनी टेलिग्राम
ऍपच्या माध्यमातून सारा प्रकार केल्याचे उघडकीस आले आहे.
9 ऑगस्ट 2022 रोजी सचिन श्रीधर कमतर (वय 32) या शिक्षण खात्याच्या अधिकाऱयांनी दिलेल्या फिर्यादीवरून गोकाक शहर पोलीस स्थानकात (गुन्हा क्र. 96/2022 कलम 406, 417, 420, 426, 116, सहकलम 34) अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख महानिंग नंदगावी आदी वरि÷ अधिकाऱयांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी आतापर्यंत 14 जणांना अटक केली आहे.
यापैकी 5 संशयितांनी बारावे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने सिद्धाप्पा मदिहळ्ळी, सुनील बंगी, सिद्धाप्पा कोट्टल, संतोष मंगावी, रेणुका जवारी या पाच जणांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. या परीक्षा घोटाळय़ात अनेकांचा सहभाग तपासात आढळून आला आहे. त्यांचीही लवकरच धरपकड केली जाणार आहे.
गोकाक ते गदगपर्यंत प्रकरणाचे धागेदोरे
7 ऑगस्ट रोजी झालेल्या केपीटीसीएल परीक्षेची प्रश्नपत्रिका ज्या गदग येथील नगरसभा पीयू कॉलेजमधून फुटली, तेथील उपप्राचार्य व प्राचार्यांच्या मुलासह तिघा जणांना अटक करण्यात आली आहे. सध्या गोकाक ते गदगपर्यंत या प्रकरणाचे धागेदोरे पोहोचल्याचे सामोरे आले असले तरी यामागे मोठी टोळी कार्यरत असल्याचे पोलीस तपासात आढळून आले आहे. या घोटाळय़ासाठी संजीव भंडारी हा आधुनिक उपकरणे पुरवित होता, अशी माहिती मिळाली आहे.
गोकाक पोलिसांनी अटक केलेला संजीव भंडारी एका पोलिसाचा मुलगा आहे. पोलीस भरती परीक्षा घोटाळय़ातही त्याचे नाव ठळक चर्चेत आले होते. त्यावेळीही त्याच्यावर कारवाई झाली होती. एका प्रकरणात अटक होऊन बाहेर पडल्यानंतरही त्याने आपले उद्योग सुरूच ठेवले आहेत. परीक्षेतील घोटाळा टाळण्यासाठी परीक्षा केंद्रांवर मोबाईल जॅमर बसविण्यात येतात. या टोळीतील गुन्हेगार जॅमरही निष्क्रिय करतात.
प्रकरण चौकशीसाठी सीआयडीकडे सोपविणार का?
यापूर्वी बेळगावसह राज्यातील वेगवेगळय़ा जिल्हय़ात घडलेल्या पोलीस भरती परीक्षा घोटाळय़ांची चौकशी सीआयडी अधिकारी करीत आहेत. बेळगाव शहर व जिल्हय़ातील सुमारे सहाहून अधिक प्रकरणे सीआयडीकडे आहेत. आतापर्यंत 14 जणांना अटक झालेल्या केपीटीसीएल परीक्षा घोटाळय़ाचा विस्तारही मोठा आहे. यामुळे हे प्रकरणही चौकशीसाठी सीआयडीकडे सोपविणार का? असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
एकामागोमाग परीक्षा घोटाळे उघडकीस येत आहेत. सरकारी अधिकारी, राजकीय नेते, शिक्षण क्षेत्रातील तज्ञ अशा सर्वच प्रति÷ित क्षेत्रातील व्यक्तींची नावे या परीक्षा घोटाळय़ाशी जोडली जात आहेत. ज्यांना लाखो रुपये मोजण्याची क्षमता आहे, त्यांचीच अशा घोटाळेबाजांमुळे सरकारी नोकरीमध्ये नियुक्ती होते. दिवसरात्र अभ्यास करून उत्तम गुण मिळविणारे प्रतिभावान विद्यार्थी या घोडेबाजारात मागे पडतात. गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय करणारी ही कीड समूळ नष्ट करणार की भविष्यातही घोटाळय़ांचे हेच चित्र पहायला मिळणार? अशा संतप्त प्रतिक्रिया जनतेतून व्यक्त होत आहेत. भ्रष्टाचार करून सरकारी नोकरी मिळविलेले नंतरही भ्रष्टाचारानेच वागणार, एवढे साधे गणितही सरकारच्या ध्यानी येत नाही, याला काय म्हणावे?
तूर्त तपास स्थानिक पोलिसांकडेच
यासंबंधी जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांच्याशी संपर्क साधला असता केपीटीसीएल परीक्षा घोटाळा प्रकरणाची चौकशी सध्या स्थानिक पोलीस करीत आहेत. गुन्हय़ात ज्यांचा ज्यांचा सहभाग आढळेल त्यांची धरपकड केली जात आहे. आतापर्यंत 14 जणांना अटक झाली आहे. या प्रकरणातील आणखी काही आरोपी फरारी आहेत. त्यांनाही लवकरच अटक करण्यात येणार आहे. या प्रकरणाचा विस्तार लक्षात घेऊन चौकशी सीआयडीकडे सोपवायची की स्थानिक पोलिसांकडेच ठेवायची? याचा विचार होणार आहे. सध्या तरी गोकाक पोलिसांवरच चौकशीची जबाबदारी आहे.