जिल्हाधिकारी राहुल रेखावार
प्रतिनिधी/कोल्हापूर
पी. एम. किसान योजनेचा लाभ सुरु ठेवण्यासाठी ई-केवायसी प्रमाणीकरण करुन घेणे बंधनकारक आहे. यासाठी बुधवार (दि.07) पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यावेळेत संबंधित लाभार्थ्यांनी ई-केवायसी केली नाही, तर त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही, असे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी रविवारी प्रसिध्दीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
पी. एम. किसान योजनेतील लाभार्थ्यांच्या ई-केवायसी प्रमाणीकरणाचे काम सध्या सुरु असून याअतर्गंत लाभार्थ्यांची आधारकार्ड जोडणी करुन घेतली जाणार आहे. लाभार्थ्यांनी ’आपले सरकार’ केंद्रांमार्फत किंवा पीएम किसान ऍपद्वारे ई- केवायसी प्रमाणीकरण करुन घ्यावे, असे आवाहन ही त्यांनी केले आहे.