सातारा शहरासह जिह्यात पारंपारिक वाद्यांना पसंती
प्रतिनिधी/ सातारा
गेले दहा दिवस विराजमान झालेले गणपती बाप्पांना येणारी संकटे, विघ्ने टाळून सुखी दिवस आण, अशी प्रार्थना करत भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. जिह्यातील सुमारे साडे चार हजार मंडळांच्या गणेशमूर्तीचे तर सातारा शहरातील 500 गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. शुक्रवारी दुपारी सातारा पालिकेच्या गणेशोत्सव मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीला खासदार उदयनराजेंच्या हस्ते आरती होऊन प्रारंभ झाला. सकाळी 7 वाजेपर्यंत शहरातील शेवटचा मानाचा गणपती शिवपार्वती मंडळाचा गणपती विसर्जन करण्यात आला.
यावर्षी गणेशोत्सवाला शासनानेच परवानगी दिल्याने जिह्यात अनोखा उत्साह पहायला मिळत होते. गेली दहा दिवस गणेशोत्सव मंडळांनी आणि घरगुती गणेशोत्सवापुढे नुसती धामधुम सुरु होती. विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत होते. आपल्या लाडक्या बाप्पांना निरोप अनंत चतुदर्शीच्या दिवशी देण्यासाठी सातारा शहरासह जिह्यात गडबड सुरु होती. सातारा शहरात अनेक गणेशोत्सव मंडळांनी आपल्या मिरवणुका पारंपारिक वाद्यात सकाळी 10 वाजताच काढल्या होत्या. कार्यकर्तेही तल्लीन होऊन पारंपारिक वाद्यात ढोलताशाच्या गजरात नाचत मिरवणुकीत गुलाल उधळत सहभागी झाले होते. बाप्पा मोरया रे असा जयघोष करत मिरवणुकांमध्ये रंगत येत होती. साताऱयात मिरवणुका पाहण्यासाठी चौका चौकात सातारकरांनी गर्दी केली होती. मिरवणुकीत सातारा पोलिसांचा कडेकोड बंदोबस्त पहायला मिळत होता. जिह्यातील सुमारे साडे चार हजार तर शहरातील पाचशे मंडळांकडून मूर्तीचे विसर्जन विधीवत पद्धतीने करण्यात आले.
मुख्याधिकाऱयांसह अधिकाऱयांनी जागवली पहाट
सातारा शहरातील गणेश विसर्जन हे चांगल्या प्रकारे व्हावे याकरता मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी सर्वच अधिकारी कर्मचाऱयांना सूचना दिल्या होत्या. नुसत्या सूचना देऊन ते थांबले नव्हते तर स्वतः मुख्य अभियंता दिलीप चिद्रे यांच्यासोबत दुचाकीवरुन प्रत्येक विसर्जन तळय़ाच्या ठिकाणी जाऊन पाहणी करत होते. मुख्य विसर्जन तळय़ाच्या ठिकाणीही त्यांनी रात्री उशिरापर्यंत अगदी सकाळपर्यत थांबून लक्ष देऊन होते. त्याचबरोबर अभियंता अनंत प्रभुणे, अभियंता सुधीर चव्हाण, अभियंता शहाजी वाठारे यांच्यासह सर्वच अधिकारी, कर्मचारी हे काम करताना दिसत होते. अगदी बाप्पांच्या मूर्ती उचलण्यापासून अधिकारी कार्य करताना दिसत होते.
उदयनराजेंच्या हस्ते आरती आणि मुख्याधिकाऱयांच्या हस्ते नारळ
शहरातील मिरवणुकांना प्रारंभ हा सातारा पालिकेच्या गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तीची मिरवणूक सुरु होत नाही तोपर्यत काढल्या जात नाहीत, अशी परंपरा आहे. दुपारी खासदार उदयनराजेंच्या हस्ते आरती होऊन विसर्जन मिरवणुकीचा नारळ मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या हस्ते फोडून प्रारंभ झाला. विशेष म्हणजे या मिरवणुकीमध्ये वाद्य म्हणून पारंपारिक वाद्य होते.
कार्यकर्त्यांनीच केले स्वागत, नेत्यांच्या भेटीगाठीवर भर
दरवर्षीप्रमाणे दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यासाठी स्टेज उभारणी केले होते. त्या स्टेजकडे दोन्ही नेते फिरकले नसल्याचे सांगण्यात येते. परंतु दोन्ही नेते प्रत्यक्ष गाठीभेटीवर भर देत होते. अगदी उदयनराजेंनी तर मुख्य विसर्जन तळय़ावर भेट दिले. त्यांनी मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्यासह सर्वांचे कौतुक केले.
पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल स्वतः बंदोबस्तात
गणेशात्सवाची विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडावी यासाठी पोलीस प्रशासन म्हणून पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी आदेश दिले होते. त्यानुसार सातारा शहरासह जिह्यात सर्वच ठिकाणी मिरवणूका शांततेत पार पाडाव्यात यावर त्यांचे स्वतःचे लक्ष होते. सातारा शहरातील विसर्जन मिरवणुकीत स्वतः पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल हे रस्त्यावर उतरून मिरवणुकीत लक्ष ठेऊन होते. त्यांनी मुख्य विसर्जन तळय़ांच्या ठिकाणी असलेल्या बंदोबस्ताची पाहणी केली. ज्या मंडळांनी नियम मोडले त्यांच्यावर कारवाईच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली.
पावसात मिरवणूका सुरु होत्या
सकाळपासून मिरवणुका सुरु होत्या. पावसानेही आपली रिपरिप सुरु ठेवली होती. त्यामध्ये काही काळ मिरवणुका थांबल्या असल्या तरीही गणेशभक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पांना निरोप देण्यासाठी भक्त तलीन होऊन भर पावसातही पारंपारिक वाद्यावर नाचत होते. तो एक वेगळाच आनंद होता.