पेरणी झालेल्या पिकांना फटका बसण्याची शक्यता : मृग नक्षत्र वाया जाण्याची भीती
प्रतिनिधी /बेळगाव
यंदा अवकाळी पावसाने बऱयापैकी साथ दिली. मात्र मृगाने ओढ दिल्याने बळीराजा चिंतेत सापडला आहे. मृग नक्षत्रात काहीकाळ कोसळलेल्या पर्जन्यराजाने आपला मारा थांबविला. अतिशय थोडय़ा प्रमाणात पडून पावसाने दडी मारली आहे. यामुळे शेतकऱयांची पंचाईत झाली आहे. पिके वाढण्यासाठी पुरेसा पाऊस आवश्यक आहे. मात्र तोच गायब झाला आहे. यामुळे पिके सुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या पावसाची नितांत गरज आहे.
पावसाने पाठ फिरविल्याने अनेक शेतकऱयांना फटका बसण्याची शक्यता आहे. बहुतांश ठिकाणी भातपेरणी केली आहे तर काही ठिकाणी अजूनही पेरणी करायची शिल्लक आहे. यावर्षी वळिवाने संपूर्ण जिल्हय़ाला चांगलेच झोडपले. जोरदार पाऊस आणि वाऱयाने अनेक घरांची पडझड होऊन मोठे नुकसान झाले आहे. मात्र मृगाने ओढ दिल्याने शेतकऱयांतून चिता व्यक्त करण्यात येत आहे.
पेरणी केलेल्या भातांना फटका
मागीलवर्षाच्या तुलनेत यावर्षी वळिवामुळे मोठे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. हवामान खात्याने 15 जूनपासून जोरदार पाऊस होईल, अशी आशा व्यक्त केली होती. मात्र अजूनही पावसाने म्हणावी तशी साथ दिली नाही. परिणामी पेरणी केलेल्या भातांना याचा फटका बसण्याची शक्मयता आहे. त्यामुळे शेतकरी आता पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. येत्या चार-पाच दिवसांत पाऊस पडला नाही तर मोठी समस्या निर्माण होणार आहे.
मृग नक्षत्राने ओढ दिल्याने बळीराजा चिंतेत
मे महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात जिल्हय़ातील विविध भागात वळिवाने जोरदार हजेरी लावली. वळिवामुळे काही ठिकाणी नाल्यांनाही पाणी आले आहे. उन्हाळय़ानंतर नाल्यांना लवकर पाणी येणे तसे दुरापास्तच. पण यावर्षी जिल्हय़ातील काही नाल्यांना व नद्यांना पाणी आले आहे. मागील दोन वर्षांपासून पावसाने बऱयापैकी साथ दिली. पूरपरिस्थितीमुळे समस्याही निर्माण झाल्या होत्या. यावषी मृग नक्षत्राने ओढ दिल्याने बळीराजा चिंतेत आहे.
मागीलवर्षी वळिवामुळे जिल्हय़ात वीज पडून मोठय़ा प्रमाणात प्राणहानी झाली. घरांचीही पडझड झाली. यंदाच्या वळिवात विद्युत खांब, टेलिफोन खांब, कोसळून मोठे नुकसान झाले आहे. हेस्कॉम, बीएसएनएल यांचेही लाखो रुपयांची हानी झाली आहे. काही झाडे व फांद्या कोसळून वाहनांचे आणि घरांचेही नुकसान झाले आहे. यावर्षी वळिवाच्या रुद्रावतारामुळे अक्षरशः जनता हैराण झाली. अनेकांचे पाण्याचे विद्युतपंप आणि इंधनवर चालणाऱया पंपांचेही मोठे नुकसान झाले आहे. विद्युतपंपासाठी जोडण्यात आलेल्या विद्युतवाहिन्या आणि मीटरही खराब झाल्याचे प्रकार घडले. मात्र त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली. परिणामी शेतकऱयांना त्याचा फायदा झाला. मात्र आता पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत.
सर्वांच्या नजरा पावसाकडेच
यंदा मृगाच्या अगोदर अति पाऊस झाल्याने शेतीत मशागत करणेही लांबणीवर पडले होते. बऱयाच शिवारातील बांधही फुटून गेले होते. यामुळे शेतकऱयांना पुन्हा बांध घालावे लागले. मान्सूनचेही दमदार आगमन झाल्याने बळीराजा खूष होता. मात्र त्यानंतर त्याची दडी त्रासदायक ठरली आहे. आता शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असून कधी पाऊस पडणार याकडेच सर्वांच्या नजरा लागून आहेत.