ऑनलाईन टीम/तरुण भारत
कोल्हापूर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागात गेली चार दिवस मुसळधार पाऊस सुरु आहे. सलग सुरु असणाऱ्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर, सातारा, सांगलीसह परिसरातील काही नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. अनेक ठिकणी पाणी पात्राबाहेर पडल्याने शेती शिवारात घुसले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात धारण क्षेत्रात सुरु असणाऱ्या पावसामुळे पंचगंगा पाणी पातळीत वाढ झाली आहे. मुसळधार पावसामुळे भाजीपाल्यासह पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान, चार दिवस झालेल्या परतीच्या पावसामुळे शिरोळ तालुक्यात भाजीपाल्यासह पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मुसळधार पावसामुळे उसासह भाजीपाला व नव्याने पेरणी केलेल्या शिवारामध्ये पाणी साचून राहिले आहे. पिकात पाणी साचल्यामुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता वाढली आहे. विशेष करून या पावसाने भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचा लाखो रुपयांचा खर्च गेला वाया गेला आहे. तर नांदणी गावातील शेतकरी अभिजीत पाटील यांनी घेतलेलं ढबू मिरचीच उभ पीक काढून टाकलं आहे. पावसामुळे पाटील यांनी नऊ लाख रुपये खर्च करून पिकवलेलं दोन एकर ढबू मिरचीच पीक भुईसपाट झालं आहे.
जिल्ह्यात चर दिवसांपासून मुसळधार पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अनेक पुके शेतात भुईसपाट झाली आहेत. पावसामुळे भाजपाला कुजून गेला आहे. तर सोयाबीन भुईमूगसह सर्वच पालेभाज्या, पिकांना परतीच्या पावसाचा फटका बसला आहे.
हे ही वाचा : राधानगरी धरणाचे ४ स्वयंचलित दरवाजे उघडले, तर कोयनेचे ६ वक्र दरवाजे उघडणार