काही जणांकडून भात पेरणीला तर काहींची शेत मशागतीच्या कामाला सुरुवात : ओलीमध्येच पेरणी करण्यासाठी प्रयत्न
प्रतिनिधी /येळ्ळूर
बासमतीचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या येळ्ळूर परिसरातील शेतकरी पेरणीच्या तयारीला लागला आहे. काही शेतकऱयांनी ओलीमध्येच पेरणी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. काही जण पेरणी करण्यासाठी मशागतीच्या कामामध्ये गुंतले आहेत. मध्यंतरी झालेल्या पावसामुळे भात पेरणी यावषीही खोळंबणार अशीच चिन्हे दिसत होती. त्यामुळे अनेक शेतकऱयांनी घाईगडबड करून ओलीतच पेरणी करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे अनेक जण मशागत करूनच पेरणी करण्याच्या तयारीला लागले आहेत.
येळ्ळूर परिसरातील बळीराजा दरवषी धूळवाफ पेरणीसाठी तयारी करत असतो. मात्र, यावषी वळिवाचे पाऊस आणि चारच दिवसांपूर्वी झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे शेतकरी मोठय़ा तणावाखाली आला आहे. मान्सूनही काही दिवसात दाखल होण्याची शक्मयता आहे. त्यामुळे बळीराजा घाईगडबडीत भातपेरणी करत आहे. ओलीमध्ये पेरणी करताना अधिक मनुष्यबळ लागते. ओलीमध्ये कुरी ओढताना मोठी कसरत करावी लागते. तरीदेखील अनेक शेतकरी ओलीमध्ये भात पेरणी करत आहेत.
धूळवाफ पेरणी झाली तर शेतकऱयाला मोठा दिलासा मिळतो. कारण धूळवाफ पेरणी करणे सोयीचे ठरते. त्यामुळे येळ्ळूर परिसरातील 90 टक्के शेतकरी धूळवाफ पेरणी करत असतात.
मात्र, यावषी वळीव आणि मान्सूनपूर्व पावसामुळे धूळवाफ पेरणी करणे अशक्मय झाले आहे. पावसाला एकदा सुरुवात झाली तर तो थांबणे कठीण असते. पेरणीनंतर शिवारात पाणी साचले तर बी कुजून जाण्याची भीती असते. त्यामुळे लवकर पेरणी करून किमान एक-दोन कोळपणी (हुट्ट) झाली तर शिवारात भरणाऱया पाण्यापासून त्या भाताला धोका कमी पोहोचतो. त्यामुळे बहुसंख्य शेतकरी पेरणी करण्याच्या तयारीत आहेत.
पाणथळ जमिनीतील भात पेरणी जोमाने
सध्या पाणथळ जमिनीतील भात पेरणी जोमाने सुरू आहे. अद्याप माळवट तसेच गावाशेजारील जमिनीमधील भातपेरणी शिवार स्वच्छ करूनच केली तर सोपे जाणार आहे. म्हणून सध्या कोळपण करण्याचे काम सुरू आहे. याचबरोबर बांध बांधणे हे कामही जोरात सुरू झाले आहे.
एकूणच येळ्ळूर परिसरातील बळीराजा भात पेरणीच्या कामामध्ये आणि मशागतीमध्ये जोमाने गुंतल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
बैलजोडय़ा कमी झाल्याने मनुष्यबळावरच मदार
गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये मान्सून दमदार झाल्याने भात पिकाला फटका बसला होता. यावषीही तशीच परिस्थिती निर्माण होणार का? या भीतीखाली शेतकरी वावरत आहे. सध्या बैलजोडय़ांची कमतरता भासत आहे. बैलजोडय़ा कमी झाल्यामुळे मनुष्यबळावरच भात पेरणी करताना बळीराजा दिसत आहे. शेतकऱयांनी शेतीच्या बांधांवर माती घालून व गाद्यात शेणखत पसरविले आहे. याचबरोबर कुळवण करून पेरणीसाठी शेती सज्ज करताना दिसत आहे.