म्हापशात न्यू इंडिया मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीचे उद्घाटन
प्रतिनिधी /म्हापसा
द न्यू इंडिया मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लिमिटेडने ऑर्गेनिक हब सुरू केला आहे ही एक राज्यासाठी चांगली गोष्ट आहे. त्यांनी महाराष्ट्रात सुमारे 9 हजार शेतकऱयांना एकत्रित आणून त्यांचे ऑर्गेनिक प्रोडक्ट घेऊन विकले व त्याचा फायदा शेतकऱयांना झाला. तशा पद्धतीची योजना राज्यातही या सोसायटीनी हाती घ्यावी व शेतकऱयांच्या मदतीस पुढे यावे. राज्यातील शेतकऱयांनी पारंपरिक आणि प्राकृतिक शेतीकडे वळावे जेणेकरून राज्याला स्वयंपूर्ण होण्यास वेळ लागणार नाही. सहकार चळवळ राज्यात वाढणार याची आपण अपेक्षा करतो. म्हापशात सुरू झालेली ही न्यू इंडिया मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीची चळवळ पुढे जावो असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.
न्यू इंडिया मल्टिपर्पज को. ऑप. सोसायटी लिम्टेड म्हापसा गोवा निम द ऑर्गेनिक हबचे आल्त म्हापसा युनियन रेस्टॉरंट जवळ समई दीप प्रज्वलित व फित कापून रितसर उद्घाटन केल्यावर मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी वयासपीठावर सहकार मंत्री सुभाष शिरोडकर, जीएसआयडीसीचे उपाध्यक्ष दीपक नाईक, नगराध्यक्षा शुभांगी वायंगणकर, शेतकरी आणि अभिनव फार्म क्लबचे अध्यक्ष ज्ञानेश्वर बोडके, शेतकरी सहसंस्थापक संचालक टू ब्रदर्स ऑर्गेनिक फार्म्सचे सत्यजीत हांगे, चेअरमन मनोहर शेटगावकर, उपाध्यक्ष अनंत पानसेकर, सचिव विकेश हरमलकर, खजिनदार-वृंदा गाड, संचालक आश्विनकुमार प्रभू तानाजी, झेवियर फर्नांडिस, वंदना भिवशेट, रिना तामोसकर, व्यवस्थापकीय संचालक समीर मोरजकर उपस्थित होते.
राज्य सरकार सेव्ह सोयल मुव्हमेंट हाती घेणार
आम्ही सेव्ह सोयल मुव्हमेंट हाती घेणार आहे. पूर्वी खत घालून शेती करीत होते मात्र आज खत घालत आहोत. प्लास्टिक आदी कचऱयामुळे जमिनी खराब होत चालल्या आहेत. आम्ही प्राकृतिक शेतीकडे वळत आहोत. तीच योजना आम्ही राज्यात आणू पाहत आहे जेणेकरून नैसर्गिक शेतीतून उत्पन्न होणारे धान्य आम्हाला खायला मिळणार आहे. पारंपरिक काजू, नारळ, फणसाला आजही कुणी खत घालत नाही. फणस येथून निर्यात होते यापुढेही फणसाला मोठे मार्केट मिळणार आहे. उकडा तांदुळही अमेरिकेत निर्यात होतो. अशी पारंपरिक आणि प्राकृतिक शेती झाली तर गोव्यात स्वयंपूर्ण होण्यास सर्व खाती चांगल्यारित्या सहकार्य करणार असून ती सहकारी सोसायटीमधून व्हावीत असे मुख्यमंत्री म्हणाले.
सहकारी संस्थानी शेतकऱयांची मदत कारवी
सरकार चळवळ आम्ही राज्यभर पाहत आहोत. मल्टिपर्पज सोसायटीटे जे संचालक आहेत ते एकत्रित आहेत. अशा पद्धतीत शेतकऱयांना एकत्रित घेऊन पुढे जाणे ही अभिनंदनास्पद गोष्ट आहे. गोव्यातील शेतकऱयांशी बोलणी करून राज्यातील शेतकरी पिकविणारे सर्व साहित्य घेऊन ते गोव्यातील शेतकऱयांना त्याचा फायदा करून द्यावा. महाराष्ट्राबरोबर गोव्यातही अशी योजना द्यावी त्यासाठी शेतकरी वर्गांना पाहिजे ते सर्व सहकार्य देण्यास तयार आहे अशी अनेकदा अशी कामे करण्यास सरकार कमी पडतो अशावेळी सहकारी संस्थांनी शेतकऱयांच्या मदतीस पुढे यावे असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले.
न्यू इंडिया सोसायटीने राज्याचे मार्केटिंग करावे
महाराष्ट्रात गेल्या वर्षी 9 हजार शेतकऱयांना एकत्रित आणून त्याचे प्रोडक्ट विकत घेतले व नंतर सहकारी सोसायचीने ते आपण विकले यात शेतकरी व सोसायटीला त्याचा फायदा झाला. अशी सुविधाही त्यांनी गोव्यात राबवावी अशी माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. गोव्यातील शेतकऱयांचे साहित्य या न्यू इंडिया मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीने घ्यावे व त्याचे मार्केटिंग करावे असे मुख्यमंत्री म्हणाले. गोव्यात ऑर्गेनिक प्रोडक्ट देणे गरजेचे आहे. आम्ही काय खातो याची आम्हाला माहीत करून घ्यायला पाहिजे. यावेळी सहकार मंत्री सुभाष शिरोडकर यांनी अभिनंदन केले. सूत्रसंचालन डॉ. गोविंद भगत, स्वागत चेअरमन मनोहर शेटगांवकर तर आभार समीर मोरजकर यांनी मानले.