सातारा / प्रतिनिधी :
पुणे-बेंगळूर महामार्गावरील खंडाळय़ाच्या बोगद्यात आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास इनोव्हा कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात इनोव्हामधील 2 जण जागीच ठार झाले असून, 5 जण जखमी आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील एक कुटुंब गोकर्ण महाबळेश्वर येथून विकेंड ट्रीप संपवून इनोव्हा कारने पुण्याला निघाले होते. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास त्यांची कार खंडाळय़ाच्या बोगद्यातून जात असताना ड्रायव्हरला डुलकी लागली आणि त्याचा कारवरील ताबा सुटल्याने अपघात झाला. या भीषण अपघातात कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर पाच जण गंभीर जखमी आहेत. जखमींमध्ये दीड वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे. जखमींना शिरवळच्या जोगळेकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अधिक वाचा : आमच्या सरकारमुळे राज्याची प्रगती