सावंतवाडी/ प्रतिनिधी –
आपल्या भारतीय संस्कृतीत रक्षाबंधनाला खूप महत्व आहे . एका भावाने त्याच्या बहिणीचे सर्व संकटांपासून रक्षण केलं पाहिजे असं हा सण अधोरेखित करतो. हा सण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलाय .त्यामुळे बाजारपेठा तूफ़ान गजबजल्यात .आपल्या लाडक्या भावाला राखी बांधण्यासाठी प्रत्येक बहीण आतुर झालीये. त्यामुळे सर्व भगिनीवर्गाची पावले आता राखीच्या दुकानाकडे वळताना दिसतायत.बाजारात विविध आकर्षक बनावटीच्या राख्या विक्रीकरिता उपलब्ध दिसतायत. त्यामुळे ग्राहकांनाही त्यांच्या पसंतीची राखी निवडण्यास पर्याय समोर आहेत.