ऑनलाईन टीम/तरुण भारत
तामिळानाडूतील (tamilnadu) मदुराई (madurai) जिल्ह्यात फटाक्यांच्या कारखान्याला भीषण आग (Fierce fire at cracker factory) लागली. या आगीनंतर मोठा स्फोट झाला. या स्फोटात ५ जणांचा मृत्यू झाला असून १० कामगार गंभीर जखमी झालेत. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
कारखान्याला आग लागल्याची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. याची माहिती तातडीने अग्निशमन दलाला देण्यात आली. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. मात्र, या कारखान्यात झालेल्या स्फोटाचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे.मदुराई एसपींनी पाच जणांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे.
एसपींनी सांगितले की, मदुराई जिल्ह्यातील उसिलामबत्ती भागाजवळ एका फटाक्यांच्या कारखान्यात आग लागली. आगीचे कारण समजू शकले नाही. सध्या तपास सुरू आहे. याप्रकरणी दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असं त्यांनी नमूद केले.
हे ही वाचा : मालदीवमध्ये भीषण आग ; ९ भारतीयांचा मृत्यू