लखनौमध्ये पाणी साचल्याने शाळा बंद
ऑनलाईन टीम / लखनौ
लखनौमध्ये तीन दिवसांपासून पडत असलेला पाऊसामुळे सखल भागात पाणी साचल्यामुळे शुक्रवारी एका बांधकाम चालू असलेल्या घराची भिंत कोसळून तीन मुलांसह नऊ जणांचा मृत्यू दोन जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या महितीनुसार मृत्यूमुखी पडलेले लोक हे झाशी येथील बांधकाम कामगार असून ते बांधकामाजवळच राहत होते. हे नऊ कामगार गाढ झोपेत असताना भिंत कोसळली. या घटनेत दोन जोडप्यासह त्यांच्या लहान मुलांचा समावेश आहे. या लहान मुलांमध्ये एक मुलगी आणि दोन मुलांचा समावेश आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त करत नऊ जणांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची मदत जाहीर केली. जखमींवर शक्य तितके उपचार करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. या घटनेनंतर जिल्हा दंडाधिकारी एसपी गंगवार यांनी, सर्व ट्रॉमा मॅनेजमेंट युनिट्ससह रुग्णालये आणि प्राथमिक आणि सामुदायिक आरोग्य केंद्रांना अलर्टवर ठेवण्यात आल्याचे सांगितले आहे.