नवी दिल्ली
भारताने कर्जबाजारी श्रीलंकेला यावषी जानेवारीपासून कर्ज, क्रेडिटलाईन आणि क्रेडिटस्वॅपमध्ये सुमारे 23 हजार कोटी रुपयांची मदत दिली असल्याचे भारतीय उच्चायुक्ताने स्पष्ट केले आहे. सध्या श्रीलंका स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात वाईट आर्थिक संकटातून जात आहे. श्रीलंकेत, देश मुख्य खाद्यपदार्थ आणि इंधनांच्या आयातीसाठी पैसे देऊ शकत नाही. अशा परिस्थितीत भारताने शेजारी देशाला मदतीचा हात पुढे केला आहे. भारताकडून इंधनासह जीवनावश्यक वस्तू आणि धान्योत्पादनांची निर्यात करण्यात आली आहे. या मदतीसाठी द्विपक्षीय पातळीवर करारही करण्यात आले आहेत.