जिल्हा पोलीस अधीक्षकांचे चौकशीचे आदेश; कंपनीचे व्यवहार संशयास्पद असल्याची गुहागरच्या पंकज दळवींची एसपींकडे तकार; डीवायएसपी सचिन बारी करणार चौकशी
गुहागर प्रतिनिधी
तालुक्यातून सुरू झालेल्या टीडब्ल्यूजे असोसिएट पा. लि. या कंपनीद्वारे गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक होत आहे. कंपनीचे व्यवहार संशयास्पद आहेत. तरी या कंपनीची सखोल चौकशी करावी, अशी मागणीवजा तकार तालुक्यातील जानवळे येथील पंकज शोभा दळवी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्याकडे केली आहे. दरम्यान, याची दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी यांना या पकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
दळवी यांनी आपल्या तकारीत पुढे म्हटले आहे की, शेअर बाजार गुंतवणुकीतून आकर्षक व हुकमी परताव्याच्या आमिषाद्वारे केल्या जाणाऱया फसवणुकीची संख्या असंख्य आहे. समीर सुभाष नार्वेकर व नेहा समीर नार्वेकर हे दोन्ही संचालक असलेली टीडब्ल्यूजे असोसिएट पा. लि. कंपनी गुंतवणूकदारांना शेअर बाजार गुंतवणुकीतून 40 ते 60 टक्के वार्षिक परताव्याची आकर्षक योजना देत असल्याचा दावा करून गुंतवणूक स्वीकारत आहेत. गुंतवणूक स्वीकारताना स्वतंत्र कराराद्वारे ते रोख व धनादेशाद्वारे गुंतवणूक रक्कम स्वीकारतात. शेअर बाजार गुंतवणूक स्वीकारताना सिक्युरिटी अँण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने काही बंधन व अधिकृत लायसेन्स गुंतवणूक स्वीकारणाऱया कंपनीकडे असणे आवश्यक आहे. टीडब्ल्यूजे असोसिएट आपल्या सर्व समाजमाध्यमावरील जाहिरातींद्वारे पोर्टफोलिओ मॅनेजर सर्व्हिसेस व त्यांची कार्यप्रणालीही तशीच आहे, परंतु यासंबंधी एँिंघ् (सेक्युरीटी अॅण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया)कडे यासंबंधी माहिती अधिकारातून माहिती मागवली असता टीडब्ल्यूजेकडे शेअर बाजार गुंतवणुकीसंबंधी कोणत्याही प्रकारचे शेअर ब्रोकर अथवा पोर्टफोलिओ एसईबीआय नोंदणीकृत परवाने नसल्याचे आम्हाला पत्राद्वारे उत्तर देण्यात आले. यामुळे या आर्थिक गुह्याच्या माध्यमातून अनेक गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. यापूर्वी महाराष्ट्रात शेअर बाजार गुंतवणुकीसंबंधी स्वढममधील आर्थिक गुह्यांची पार्श्वभूमी लक्षात घेता असे गुन्हे उघडकीस आल्यावर यातील गुन्हेगार परदेशात फरार होतात किंवा भूमिगत होतात व लोकांचे पैसे परत मिळणे कठीण होते. त्याच अनुषंगाने टीडब्ल्यूजे असोसिएट पा. लि.चे दोन्ही भागीदार समीर सुभाष नार्वेकर व नेहा समीर नार्वेकर यांची व त्यांच्या सर्व शाखांमधील कर्मचारी/सेल्स मॅनेजर यांची रत्नागिरी पोलीस प्रशासनामार्पत संपूर्ण चौकशी चालू असेपर्यंत सर्वाना जिल्हा सोडण्यास बंदी आणावी व परदेशी गमनास मज्जाव करावा, अशी मागणी या तक्रार अर्जात करण्यात आली आहे.
कंपनीच्या संचालकांची डीवायएसपी चौकशी करणार
यासंबंधी अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी यांच्याकडे आला असून त्यांनी संबंधित कंपनीच्या दोन्ही संचालकांना चौकशीसाठी बोलावून घेऊन तक्रारीच्या अनुषंगाने सर्व एँिंघ् परवाने सादर करण्यास सांगून त्या संबंधी तपास सुरु करू, असे आपल्याला आश्वस्त केल्याचे पंकज दळवी यांनी म्हटले आहे. तसेच पंकज दळवी व अवधूत वेल्हाळ यांनी यासंबंधी पसिद्धी पत्रकही तयार केले आहे.