रेल्वे खात्याने सर्व्हे करून तयार केला होता आराखडा : सातत्याने वाहतूक कोंडी होत असल्याने समस्या
बेळगाव : शहराच्या मध्यवर्ती भागातून रेल्वेमार्ग गेल्याने रेल्वे फाटक घालण्यात आले होते. मात्र रेल्वे फाटकावर होणारी वाहतूक कोंडी आणि अडचण दूर करण्यासाठी ठिकठिकाणी उड्डाणपूल उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. पहिले आणि दुसरे रेल्वेगेटच्या दरम्यान एकच उड्डाणपूल तयार करण्यासाठी रेल्वे खात्याने पाहणी करून आराखडा तयार केला होता. मात्र हा प्रस्ताव अद्यापही धूळखात पडला असून उड्डाणपूल उभारण्याचा प्रस्ताव रद्द झाला का? अशी विचारणा होत आहे. शहरातील विविध रस्त्यावर असलेले रेल्वेफाटक हटवून त्या ठिकाणी उड्डाणपुलाची उभारणी करण्याचा प्रस्ताव रेल्वेखात्याने तयार केला होता. महापालिका व्याप्तीमध्ये आठ ठिकाणी रेल्वे उड्डाणपूल उभारण्याची तयारी केली होती. यापैकी सध्या जुना धारवाड रोड, कपिलेश्वर उड्डाणपूल, गोगटे चौक, तिसरा रेल्वेगेट अशा चार ठिकाणी उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली आहे. याचप्रमाणे पहिले आणि दुसऱ्या रेल्वे फाटकावर तसेच तानाजी गल्ली, अनगोळ आदी ठिकाणी उड्डाणपूल उभारण्याचा प्रस्तावदेखील तयार करण्यात आला होता. मात्र यापैकी पहिले आणि दुसऱ्या रेल्वे फाटकावर वेगवेगळे दोन उ•ाणपूल उभारण्याऐवजी जागेअभावी एकच उड्डाणपूल उभारण्याकरिता सर्व्हेक्षण करून रेल्वेखात्याने आराखडा तयार केला होता. तसेच केंद्रीय अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आली होती. मात्र सध्या तिसऱ्या रेल्वे फाटकावरील एका बाजुच्या उ•ाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे. तर दुसऱ्या बाजुच्या उड्डाणपुलाचे काम आता सुरू करण्यात आले आहे.
पहिला रेल्वेफाटक अंत्यत महत्त्वाचा
मात्र पहिल्या आणि दुसऱ्या रेल्वे फाटकादरम्यान उड्डाणपुलाची उभारणी करण्याकरिता तयार करण्यात आलेल्या प्रस्तावाकडे रेल्वे खात्याचे दुर्लक्ष झाले आहे. वास्तविक, टिळकवाडीची विभागणी रेल्वेमार्गामुळे झाली आहे. टिळकवाडी परिसरातील नागरिकांना प्रत्येक कामासाठी रेल्वे फाटक ओलांडून आरपीडी आणि देशमुखरोड परिसरात यावे लागते. त्यामुळे हा रेल्वेफाटक खूपच महत्त्वाचा आहे. पण या ठिकाणी सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. रेल्वेखात्याने रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण करून रेलगाड्यांची संख्या वाढविली आहे. त्यामुळे दररोज 20 ते 22 वेळा रेल्वेफाटक बंद राहते. रेल्वेफाटक बंद झाल्यानंतर देशमुख रोडकडे येणाऱ्या वाहनांच्या रांगा लागतात त्यामुळे काँग्रेस रोडवर वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत आहे. य् ाा ठिकाणी दोन्ही रेल्वे फाटकाच्या मध्यभागी एकच उड्डाणपूल तयार करण्याचा प्रस्ताव रेल्वे खात्याने तयार केला होता. याकरिता महापालिका, रेल्वे खात्याने पाहणी करून आराखडा तयार केला होता. पण हा प्रस्ताव अद्यापही रखडला आहे. या ठिकाणी उ•ाणपुलाची उभारणी होणार की नाही, याबाबतही रेल्वे खात्याने आपली भूमिका स्पष्ट केली नाही. रेल्वे खात्याने तयार केलेला प्रस्ताव बासनात पडला आहे.