श्रीनगर
मे महिन्यामध्ये बीएसएफच्या छावणीवर ग्रेनेड हल्ला करुन पळून गेलेल्या दहशतवाद्यांना शुक्रवारी सुरक्षा दलांनी अटक केली आहे. अटक केलेले दहशतवादी हे आयएसजेके या संघटनेचे असून त्यांच्याकडून दोन रुग्णवाहिकांसह दुचाकीही जप्त केली आहे. हल्ल्यावेळी दहशतवाद्यांना वाहने उपलब्ध करुन देण्याबरोबर अन्य मदत दिल्याचा आरोप आहे.
20 मे रोजी श्रीनगरजवळ पांडच चौक भागात असलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या एका चौकीवर या दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यामध्ये दोन जवान हुतात्मा झाले होते. हे जवान 37 व्या बटालियनचे होते. मोटारसायकलवरुन आलेल्या तीन दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार व ग्रेनेड फेकून हल्ला केला होता.