प्रतिनिधी / लातूर
अहमदपूर तालुक्मयातील सिद्धी शुगर या कारखान्यावर ऊसतोड मजुरीचे काम करणाऱ्या कुटुंबावर शनिवारी सकाळी काळाने घाला घातला. अहमदपूर तालुक्मयातील उजनी येथील सिद्धी शुगर कारखान्याच्या शेजारी असलेल्या तलावात ऊसतोड कामगारांच्या महिला धुणे धुण्यासाठी गेल्या होत्या. त्यात पाच महिलांचा तलावात बुडून मृत्यू पावल्याची दुर्घटना घडली. या महिला ऊसतोड कामगार असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.
अहमदपूर तालुक्मयातील सिद्धी शुगर कारखान्याच्या बाजूला असलेल्या उजना येथील तुळशीराम तांडा या तलावात ऊसतोड कामगार महिला धुणे धुण्यासाठी गेल्या होत्या. हा तलाव दुर्गम भागात असल्याने या ठिकाणी महिला मृत्यू पावल्याचे कोणाच्याही निदर्शनास आले नाही. परंतु बऱयाच वेळानंतर एका व्यक्तीची मोटारसायकल जात असताना त्याला एका मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. त्या मोटारसायकल स्वाराने अधिक चौकशी केली असता त्यांचे नातेवाईक पाण्यात बुडत असल्याचे सांगण्यात आले. त्या व्यक्तीने या घटनेची माहिती तत्काळ शेजारी असणाऱया गावात जाऊन सांगितली. त्यानंतर गावकरी मदतीसाठी धावून आले होते. परंतु तोपर्यंत पाचही महिलांचा या तलावात बुडून मृत्यू झाला.
या दुर्घटनेत मृत पावलेल्या महिलांची नावे खालीलप्रमाणे आहेत. राधाबाई धोंडीबा आडे (वय 45), दीपा धोंडीबा आडे (वय 22), काजल धोंडीबा आडे (वय 19), सुषमा संजय राठोड (वय 22), अरुणा गंगाधर राठोड (वय 26) हे सर्व पालम (ता., जि. परभणी) येथील रामपूर तांडा येथील असल्याचे टोळीच्या मुकादमाने सांगितले. ही दुर्दैवी घटना किनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने किनगाव पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहचले. गावकऱयांच्या मदतीने पाचही मृतदेह बाहेर काढण्यात आले. ते शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून त्यामृत्यूचे कारण त्यानंतरच अधिकृतपणे मिळू शकेल. ऊस तोडीसाठी मजूर असलेल्या राठोड व आडे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकारामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.