जोरदार पावसामुळे घरांचे तसेच शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचा सर्व्हे लवकरात लवकर केला जाणार आहे. नुकसानग्रस्तांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी यासाठी पावले उचलले जाणार आहेत. जिल्हा पंचायत कार्यालयात पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ही माहिती देण्यात आली.
बेळ्ळारी नाल्यासंदर्भात 16 गोष्ट रोजी बैठक :
बेळ्ळारी नाल्यामुळे दरवर्षी नुकसान होत आहे. त्यामुळे यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी 16 ऑगस्ट रोजी अधिकाऱ्यांची बैठक घेतली जाणार आहे. त्या बैठकीमध्ये तातडीने मिळणारे नाल्याची खुदाई तसेच इतर समस्यांबाबत चर्चा करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.