न्हावेली /वार्ताहर-
सावंतवाडी तालुक्यात जोरदार पडलेल्या मुसळधार पावसामुळे तळवडे बाजारपेठेत पुराचे पाणी घुसले आहे तळवडे बाजारपेठेचे होणारे विस्तारीकरण तसेच वाढते बांधकाम याचा फटका पूर्णपणे बसला आहे. तसेच बाजारपेठेतून पाणी जाण्याचा मार्ग काही ठिकाणी बंद झाल्याने पाऊस पडल्यावर लगेच पाणी बाजारपेठेत घुसत आहे. यावर प्रशासनाने तात्काळ तोडगा काढणे गरजेचे आहे.
तसेच सावंतवाडी वेंगुर्ला तुळस मार्गावर पुराचे पाणी आल्यामुळे सादर मार्ग वाहतूकसाठी ठप्प झाला होता . या पावसामुळे दुकानदारांच्या काही दुकानात पाणी घुसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पुराच्या पाण्याचे योग्य नियोजन करण्याकडे प्रशासन पूर्णपणे अकार्यक्षम ठरत आहे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या दुतर्फ असलेली गटार साफ न केल्यामुळे हे पाणी पूर्णपणे रस्त्यावर येत आहे.