सध्या ख्रिसमस जगभरातील ख्रिस्तीबांधव साजरा करत आहेत. आपण ग्रेगोरियन दिनदर्शिका पाळत असल्याने, सर्वांचेच नवीन वर्ष 1 जानेवारीला सुरू होत आहे. मागची 2 वर्षे सगळय़ांनाच खूप कठीण गेली आणि त्यातून आपण सगळेच खूप काही शिकलो आहे. या अनुभवामुळे जीवनाबद्दलचा आपला दृष्टिकोन खरोखरच बदलला आहे. आपण आपल्या प्रियजनांना शारीरिक आणि मानसिक त्रासात पाहिले आहे. आपण घरात अडकून पडलो असताना असहाय्य काळदेखील अनुभवला आहे. पण माणुसकीची जिद्द आणि इच्छाशक्ती दांडगी असल्याने जग पुन्हा नव्याने सुरू झाले आहे. आणि आता आपण सगळेच नवीन वर्षाकडे एका नव्या आशेने बघतो आहोत.
नवीन वर्षाच्या सुरुवातीला बरेच लोक नवीन ध्येय ठरवतात, संकल्प करतात, जसे की तब्येतीची काळजी घेणे, आयुष्य आणखी उज्ज्वल बनवणे, मित्र-मैत्रिणीशी अधिक संवाद साधणे किंवा आपल्याला आवडती नोकरी मिळवणे. हे ध्येय, हे संकल्प माणसाला जगण्याची उमेद देतात आणि स्वतःचे आयुष्य अजून विकसित करायला प्रेरणा देतात. पण बऱयाचदा वर्षाच्या सुरुवातीला केलेले संकल्प आपण काही कारणांमुळे विसरतो आणि जीवनाच्या जबाबदाऱयांमध्ये बुडून जातो.
यावषी या सर्व संकल्पांबरोबर काही असे संकल्पदेखील आहेत ज्याचा विचार आपण केला पाहिजे. अशा काही गोष्टी आहेत ज्या छोटय़ा वाटल्या तरी माणसाच्या आयुष्यासाठी, मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी व समाजासाठी आवश्यक आहेत.
मधल्या 2 वर्षांनी माणसाला जर काही शिकवले असेल तर ते म्हणजे आयुष्य खूप अशाश्वत आणि छोटे आहे आणि म्हणूनच ते मौल्यवान आहे. जोपर्यंत आपल्याला शक्मय आहे तोपर्यंत या आयुष्याला जितके सुंदर बनवता येईल तितके आपण बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या छोटय़ा पण आवश्यक गोष्टींचा मनापासून विचार करून त्यांना मिळवण्याचा संकल्प या नवीन वर्षाच्या सुरुवातीला केला पाहिजे.
1. संवाद
एकत्र कुटुंबं आजच्या काळात खूप कमी बघायला मिळतात. त्याला बरीच कारणेही आहेत पण सगळय़ात महत्त्वाचे कारण आहे माणसाची जीवनशैली! माणूस त्याच्या कामामध्ये आणि त्याच्या गरजांमध्ये एवढा बुडाला आहे की त्याच्या ठरावीक चौकटीच्या बाहेर तो पडत नाही. अशावेळेला आपल्या आजूबाजूच्या माणसांकडे, मग ते मित्र-मैत्रिणी असोत, नातेवाईक किंवा शेजारी असोत, लक्ष द्यायला त्याच्याकडे वेळच नाही. पण समाज हा माणसं एकत्र आली तरच बनतो आणि सुखी समाज हे सुखी जीवनाचे लक्षण आहे. आपण यावषी पुन्हा एकदा समाजाचा भाग होण्यासाठी त्या हरवलेल्या मित्र-मैत्रिणींशी, नातेवाईकांशी काही मतभेद असतील तर ते विसरून संवाद साधला पाहिजे. अढी धरून बसायला आयुष्य खूप लहान आहे त्यामुळे जोपर्यंत आपल्या हातात आहे तोपर्यंत माणुसकी आणि नाती टिकवून ठेवली पाहिजेत.
2. आपल्या देशाच्या राजकारणाबद्दल जाणून घ्या
कोणताही देश राजकारणावर चालतो. भारताला राजकारणाचा एक अतिशय गुंतागुंतीचा इतिहास आहे जो आजही आपल्या जीवनशैलीवर परिणाम करत आहे. सोशल मीडियामुळे आज प्रत्येक जण आपले मत जगासमोर मांडू शकतो. एखादी गोष्ट पटली नाही तर ती गोष्ट सोशल मीडियावर व्हायरल करून मोकळे होतो आणि दुसऱया दिवशी विसरूनदेखील जातो. अशावेळेला अर्धवट माहिती मिळाल्याने आपल्या देशातील खऱया घडामोडी, त्यामुळे होणारे परिणाम आपल्याला कळत नाहीत. एक नागरिक म्हणून आपल्या हातात एक खूप मोठी जबाबदारी असते आणि ती म्हणजे चांगले सरकार निवडण्याची. अशावेळेला सोशल मीडिया आणि बातम्यांवर आंधळा विश्वास न ठेवता स्वतः आपल्या देशातील राजकारणाचा अभ्यास केला तर आपण आपल्याला हवे तसे सरकार निवडून आणायला मदत करू शकतो. याचा आपल्या समाजावरच नाही तर देशाच्या एकूण प्रगतीसाठीही खूप फायदा होईल.
3. आपल्या पर्यावरणासाठी जबाबदार असणे
जागतिकीकरण आणि तंत्रज्ञानामुळे जग झपाटय़ाने बदलत आहे. त्याचा नकारात्मक परिणाम आपल्या पर्यावरणावर होत आहे. आता बऱयाचदा हा प्रश्न पडतो की सामान्य माणूस या सगळय़ात काय करू शकतो? त्याच्याकडे ना तेवढे ढीगभर पैसे आहेत, ना मोठमोठय़ा लोकांच्या ओळखी आहेत. पण भारतामध्ये अधिकतर लोकसंख्या मध्यमवर्गीय लोकांनी भरलेली आहे आणि सामान्य माणूस म्हणून रोजच्या आयुष्यात छोटे छोटे बदल जर आपण केले, तर त्याचा परिणाम आपल्याला पर्यावरणावर नक्की दिसेल. प्लास्टिकचा वापर बंद करणे, जिकडे जमेल तिकडे सार्वजनिक वाहतूक किंवा कार पूलचा वापर करणे, गरज नसताना घरातील दिवे बंद करणे अशा छोटय़ा छोटय़ा गोष्टी जरी आपण पाळल्या तरी त्याचा फरक दीर्घ काळपर्यंत आपल्या जाणवेल.
4. समाजसेवा
माणूस इतका स्वार्थी झाला आहे की, तो त्याच्याऐवजी इतर कोणाचाही विचार करत नाही. तो करत असलेल्या प्रत्येक गोष्टीत फायदा मिळवण्याचा प्रयत्न करतो. स्वयंसेवा करणे ही एक उदात्त कृती आहे कारण त्या बदल्यात आपल्याला काहीही मिळत नाही. जेव्हा आपण एखाद्या सामाजिक कार्यासाठी स्वेच्छेने काम करता, तेव्हा आपण आपला वेळ इतर लोकांना मदत करण्यात घालवायला तयार असता. कित्येक लोक आणि जीव आहेत ज्यांना आज मदतीची गरज आहे.
जेव्हा आपल्याला गरज असते, तेव्हा आपण अशी अपेक्षा करतो की लोकांनी आपल्याला मदत करावी. मग जेव्हा आपल्याला मदत करणे शक्मय आहे तेव्हा आपण इतरांसाठी असेच का करू नये? सामाजिक कारणासाठी सेवा केली तर आपल्याला पुण्य मिळते असे म्हणतात. एका जीवाची मदत करण्याचे समाधान कोणत्याही बक्षिसापेक्षा मोठे आहे.
ही केवळ काही उदाहरणे आहेत. माणसाने ठरवले तर तो अशाच छोटय़ा छोटय़ा गोष्टींमधून मोठे बदल घडवून आणू शकतो. दरवषीप्रमाणे हे नवीन वर्षदेखील अनेक अनुभव आपल्याला देणार आहे. आता आपल्या हातात आहे की प्रत्येक अनुभवातून शिकून आपण आपले जीवन आणि आपला समाज सुंदर बनवायचा का मागच्या निराशाजनक गोष्टी मनामध्ये ठेवून आयुष्यातील छोटय़ा छोटय़ा आनंदापासून वंचित रहायचे!
-श्राव्या माधव कुलकर्णी