कोल्हापूर : विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर राज्यातील राजकारणात राजकीय अराजकता माजली आहे. शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे हे जवळपास तीस आमदारांना घेऊन नॉटरिचेबल आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या गोटात खळबळ माजली असून कोणत्याही क्षणी महाविकास आघाडीचे सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे. दरम्यान, शिवसेनेतील बंडखोर आमदारांनी भाजप सोबत युती करावी. तरच बंद मागे घेतले जातील, असा प्रस्ताव सेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जवळ ठेवला जाईल, अशी माहिती तरुण भारतच्या सूत्रांना मिळाली आहे.
अधिक वाचा : Eknath Shinde: शिवसेना नेतृत्वावर नाराज असलेले एकनाथ शिंदे आहेत तरी कोण?
दरम्यान, राज्यातील राजकीय घडामोडींने प्रचंड वेग घेतला असून भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तात्काळ अमित शहा यांच्या भेटीला गेले आहेत. तर शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे हे एक वाजता पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार आहेत. त्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले असून राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार धोक्यात आल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.